शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

माणमधील ग्रामपंचायत निवडणुकांवर नेत्यांचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वरकुटे-मलवडी :

माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित ४७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायतस्तरावर केले जात नसल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटबांधणीसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

माण तालुक्यात ९५ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यापैकी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या अनेक ग्रामपंचायती असून एकूण ४७ गावांच्या निवडणुका लागल्या आहेत. राजकीयदृष्टीने निम्मा तालुका आपल्या वर्चस्वाखाली असला पाहिजे, या भावनेतून सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. कोणता पक्ष-पार्टी या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पूर्वी गावातील गटा-तटाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात पक्षीय राजकारण शिरल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या विचारांंच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, गाव ताब्यात असल्याने विकासकामाच्या निमित्ताने लोकांशी चांगला संपर्क राहतो. आपल्या विचारांचे कार्यकर्ते, आपला गट मजबूत होतो. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुका सोप्या होऊन जातात. या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षातील मुख्य नेतेमंडळी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ देताना दिसत आहेत.

बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार केला असता, ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीला गांभीर्याने घेत असल्याचे दिसत आहेत.

(चौकट)

गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावले

माण तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी तपासली असता काही ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तर काही ग्रामपंचायतींवर भाजपा आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे, अनिल देसाई यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपापला गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.