शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अलर्ट! कुलिंग चार्जेसच्या नावावर ग्राहकांची लूट; छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणं गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:23 IST

ग्राहकांच्या गरजेचा गैरफादा घेऊन व्यावसायिकांची ही मनमानी वर्षानुवर्षे सुरू आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा - उन्हाळा सुरू झाला की तहानलेले अनेक जीव तृष्णा भागविण्यासाठी शीतपेयांची खरेदी करतात. शीतपेयांच्या वेष्ठनांवर असलेल्या किंमतीपेक्षा तीन ते पाच रूपये अधिक घेण्याचा सपाटा व्यावसायिकांना लावला आहे. कुलिंग चार्जेस लावल्यामुळे हे दर वाढीव असल्याचं गोजिरवाणं कारण व्यावसायिक पुढे करतात. मात्र, छापील किंमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही वस्तुची विक्री करणं हा दंडनीय गुन्हा आहे.

ग्राहकांच्या गरजेचा गैरफादा घेऊन व्यावसायिकांची ही मनमानी वर्षानुवर्षे सुरू आहे. पाच रूपयांसाठी कुठं कोणाशी वाद घालायचा या मानसिकेतून या तक्रारी करायला कोणीही पुढे येत नाही. याची जबाबदारी असणारा वजन मापे विभागही तक्रारदाराच्या प्रतिक्षेत असतो. त्यामुळे दुकानदारांचे चांगलेच फावले आहे. सर्रास सर्वत्र सुरू असलेल्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी वजन मापे विभागाने डमी ग्राहक पाठवून याचा पर्दाफाश करावा, अशी ग्राहकांची इच्छा आहे. एकाद्या दुसºया दुकानावर अशी कारवाई झाली तरीही अन्य ठिकाणी याचा परिणाम होईल असा कयास ग्राहक व्यक्त करत आहेत.

वाढीव पाच रूपये कमवून देतात १० हजार रूपये

उन्हाळ्याच्या दिवसांत अगदी छोट्यातील छोट्या दुकानांमध्येही शीतपेय आणि थंड पाण्याच्या बाटल्या घेण्याचा धंदा हजारांमध्ये असतो. दिवसभरांत ६० ते ७० शीतपेयांच्या बाटल्या जाण्याचे प्रमाण आहे. प्रत्येक बाटलीमागे ३ ते ५ रूपये जादा आकारले तरीही एका दुकानात सुमारे ३५० रूपये जादा दिले जातात. याचा महिन्याचा हिशेब केला तर सुमारे १० हजार रूपयांचा अतिरिक्त कमाई या व्यावसायिकांची होते. पाच रूपयांसाठी कुठं भांडत बसा असा विचार करून सामान्य याची तक्रार करत नाही परिणामी जादा पैसे घेणाºयांचे धाडस मात्र चांगलेच वाढले आहे.

अशी टाळता येईल फसवणूक

शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्यांनी ‘हे पेय थंड स्वरूपातच विक्रीसाठी ठेवावे’ अशी सुचना ठळकपणे लिहिली आहे. त्यामुळे दुकानदार जेव्हा जादा पैसे मागेल तेव्हा त्याला ही सुचना दाखवावी.  हे बघूनही त्यांनी छापील किंमतीवर दिले नाही तर संबंधितांकडून त्याची पावती घ्यावी आणि त्याच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागावी.

दुकानदारांची बनवाबनवी

१. कंपनीतून बाटल्या अशाच कोमट येतात. त्यामुळे या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात, परिणामी वीजेचे बिल जास्तीचे भरावे लागते.२. कुलिंग चार्जेस द्यायचे नसतील तर कोमट बाटल्या घेऊन जावा

प्रत्यक्ष स्थिती ही१. कुठल्याही पदार्थाचा दर ठरवताना त्याचे उत्पादन मुल्य काढले जाते. त्यानंतर त्याच्या पॅकिंगसह ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. सुपर स्टॉकिस्टपासून अगदी छोट्या दुकानारांना परवडेल याचा सारासार विचार करून किंमत लावली जाते. त्यामुळे शीतपेयांच्या विक्रीतून होणाºया फायद्यातच वीजेच्या बिलाचाही समावेश असतो.२. ‘टू बी सर्व्हड चिल्ड’ हे प्रत्येक शीतपेयावर लिहिलेले असते. त्यामुळे त्याची विक्री करताना ते थंडच असले पाहिजे हे कंपनीने अधोरेखित केले आहे.

छापील किंमतीपेक्षा जास्त दर आकारणं हा गुन्हा आहे. असे कोणी करत असेल तर संबंधितांकडून दुकानाचे नाव असलेल्या पावतीपुस्तकावर पदार्थ घेतलेल्याचे नाव, आकारलेले शुल्क आणि दिनांक यांचा उल्लेक असलेली पावती घ्यावी. त्यानंतर याची तक्रार वजन मापे विभागाकडे करण्यात यावी. त्यांनी दखल घेतली नाही तर ग्राहक न्यायालयात याची दाद मागता येते.- अ‍ॅड. धीरज घाडगे, सातारा 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर