शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

By admin | Updated: July 6, 2017 13:08 IST

डिस्कळ येथे उपक्रम : आपलं नातं आपुलकीचं ब्रिदवाक्याला अनुसरून ग्रुपचे काम

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. ५ : डिस्कळ, ता. खटाव येथील दोस्ती ग्रुप म्हणजेच दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ. हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. आपलं नातं मैत्रीचं, आपुलकीचं अन सामाजिक बांधीलकीचं या ब्रीद वाक्याला नेहमीच अनुसरून ग्रुपने अनेक कामे आत्तापर्यंत डिस्कळ पंचक्रोशीमध्ये केलेली आहेत. नुकतेच या ग्रुपने डिस्कळमध्ये गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सध्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्याथीर्ही वेळेवर शाळेत जाऊ लागले आहेत. शाळेकरीता कोणी नवीन सॅक घेतलीय, तर कोणी पावसाळ्याकरीता जर्कीन व रेनकोट तर कोणी रंगीबेरंगी छत्री घेतली आहे. हे सर्व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्यासाठी नक्कीच खरेदी केली आहे. पण ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न असतो. ते पालक कसे काय या सर्व गोष्टी खरेदी करू शकणार? ते तर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत. तर अशा हौस, मौजेच्या गोष्टी तर दूरच राहातात. म्हणून त्यांची मुले अभ्यासात कुठे कमी आहेत का? नक्कीच नाही. उलट त्यांची मुले ही शाळेत जिद्दीने व मेहनतीने पुढे जात असतात. परंतू त्यांना काही मूलभूत गोष्टींची कमी ही भासतच राहते. याच गोष्टीचा विचार करून दोस्ती ग्रुपने शालेय गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यारुपी मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार डिस्कळ येथील श्री. शिवाजी विद्यालयातील ५ वी ते ७ वीमधील प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थी मधीलही प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्यांचे वाटप दोस्ती ग्रुपच्या सदस्यांच्या तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अक्षदा गणपतराव काटकर हिचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या किर्ती सूर्यवंशी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार...

दोस्ती ग्रुपने केलेल्या मदतीचा लाभ १०० शालेय विद्यार्थ्यांना झाला असून, याचा त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना यानिमित्ताने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जातील हीच अपेक्षा व्यक्त होत होती.