शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

By admin | Updated: July 6, 2017 13:08 IST

डिस्कळ येथे उपक्रम : आपलं नातं आपुलकीचं ब्रिदवाक्याला अनुसरून ग्रुपचे काम

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. ५ : डिस्कळ, ता. खटाव येथील दोस्ती ग्रुप म्हणजेच दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ. हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. आपलं नातं मैत्रीचं, आपुलकीचं अन सामाजिक बांधीलकीचं या ब्रीद वाक्याला नेहमीच अनुसरून ग्रुपने अनेक कामे आत्तापर्यंत डिस्कळ पंचक्रोशीमध्ये केलेली आहेत. नुकतेच या ग्रुपने डिस्कळमध्ये गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सध्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्याथीर्ही वेळेवर शाळेत जाऊ लागले आहेत. शाळेकरीता कोणी नवीन सॅक घेतलीय, तर कोणी पावसाळ्याकरीता जर्कीन व रेनकोट तर कोणी रंगीबेरंगी छत्री घेतली आहे. हे सर्व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्यासाठी नक्कीच खरेदी केली आहे. पण ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न असतो. ते पालक कसे काय या सर्व गोष्टी खरेदी करू शकणार? ते तर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत. तर अशा हौस, मौजेच्या गोष्टी तर दूरच राहातात. म्हणून त्यांची मुले अभ्यासात कुठे कमी आहेत का? नक्कीच नाही. उलट त्यांची मुले ही शाळेत जिद्दीने व मेहनतीने पुढे जात असतात. परंतू त्यांना काही मूलभूत गोष्टींची कमी ही भासतच राहते. याच गोष्टीचा विचार करून दोस्ती ग्रुपने शालेय गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यारुपी मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार डिस्कळ येथील श्री. शिवाजी विद्यालयातील ५ वी ते ७ वीमधील प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थी मधीलही प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्यांचे वाटप दोस्ती ग्रुपच्या सदस्यांच्या तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अक्षदा गणपतराव काटकर हिचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या किर्ती सूर्यवंशी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार...

दोस्ती ग्रुपने केलेल्या मदतीचा लाभ १०० शालेय विद्यार्थ्यांना झाला असून, याचा त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना यानिमित्ताने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जातील हीच अपेक्षा व्यक्त होत होती.