शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

By admin | Updated: July 6, 2017 13:08 IST

डिस्कळ येथे उपक्रम : आपलं नातं आपुलकीचं ब्रिदवाक्याला अनुसरून ग्रुपचे काम

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. ५ : डिस्कळ, ता. खटाव येथील दोस्ती ग्रुप म्हणजेच दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ. हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. आपलं नातं मैत्रीचं, आपुलकीचं अन सामाजिक बांधीलकीचं या ब्रीद वाक्याला नेहमीच अनुसरून ग्रुपने अनेक कामे आत्तापर्यंत डिस्कळ पंचक्रोशीमध्ये केलेली आहेत. नुकतेच या ग्रुपने डिस्कळमध्ये गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सध्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्याथीर्ही वेळेवर शाळेत जाऊ लागले आहेत. शाळेकरीता कोणी नवीन सॅक घेतलीय, तर कोणी पावसाळ्याकरीता जर्कीन व रेनकोट तर कोणी रंगीबेरंगी छत्री घेतली आहे. हे सर्व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्यासाठी नक्कीच खरेदी केली आहे. पण ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न असतो. ते पालक कसे काय या सर्व गोष्टी खरेदी करू शकणार? ते तर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत. तर अशा हौस, मौजेच्या गोष्टी तर दूरच राहातात. म्हणून त्यांची मुले अभ्यासात कुठे कमी आहेत का? नक्कीच नाही. उलट त्यांची मुले ही शाळेत जिद्दीने व मेहनतीने पुढे जात असतात. परंतू त्यांना काही मूलभूत गोष्टींची कमी ही भासतच राहते. याच गोष्टीचा विचार करून दोस्ती ग्रुपने शालेय गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यारुपी मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार डिस्कळ येथील श्री. शिवाजी विद्यालयातील ५ वी ते ७ वीमधील प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थी मधीलही प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्यांचे वाटप दोस्ती ग्रुपच्या सदस्यांच्या तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अक्षदा गणपतराव काटकर हिचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या किर्ती सूर्यवंशी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार...

दोस्ती ग्रुपने केलेल्या मदतीचा लाभ १०० शालेय विद्यार्थ्यांना झाला असून, याचा त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना यानिमित्ताने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जातील हीच अपेक्षा व्यक्त होत होती.