शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

अतिवृष्टी : नुकसानग्रस्तांची ससेहोलपट, बाधित आहे; पण यादीत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 12:42 IST

संजय पाटील कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मिरगाववर जुलै महिन्यातील अतिवृष्टीत डोंगर कोसळला. दरडीखाली अनेकांचे संसार गाडले गेले. बाधितांना शासनाने ...

संजय पाटीलकऱ्हाड : पाटण तालुक्यातील मिरगाववर जुलै महिन्यातील अतिवृष्टीत डोंगर कोसळला. दरडीखाली अनेकांचे संसार गाडले गेले. बाधितांना शासनाने मदतही दिली; पण काही दरडग्रस्त आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान होऊनही त्यांची ससेहोलपट सुरू असून, नुकसानीचा पंचनामा करण्याचे सोपस्कारही प्रशासनाने पार पाडलेले नाहीत, हे दुर्दैव.

मिरगावमधील धोंडीराम दाजी बाकाडे हे गत तीन महिन्यांपासून प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवतायत. तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ते हाथ जोडतायत. मदतीसाठी विनवणी करतायत. मात्र, त्यांचे ऐकून घ्यायला कुणालाही वेळ नाही. नुकसान होऊनही त्यांच्या नुकसानीची दखल कोणीही घेत नाही. मिरगावमध्ये धोंडीराम बाकाडे यांचे जुने घर होते. त्या घराच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी पत्रे, लोखंडी पाईप, खांब यासह इतर साहित्य आणून टाकले होते. नवीन घरबांधणीला ते सुरुवात करणार होते; पण २३ जुलैच्या रात्री गावावर डोंगर कोसळला. या दरडीखाली सुरुवातीलाच असलेले धोंडीराम बाकाडे यांचे घर गाडले गेले. तसेच त्यांच्या घराचा प्लॉटही दरडीसोबत खाली घसरला.

या दुर्घटनेत गावातील चार घरे पूर्णपणे गाडली गेली. तसेच काही जणांचा मृत्यूही झाला. प्रशासनाने बाधितांच्या नुकसानीचे पंचनामे केले. त्यांना मदतही दिली. मात्र, धोंडीराम बाकाडे यांना कसलीच मदत मिळाली नाही. त्यांच्या नुकसानीचा पंचनामाही केला गेला नाही. त्यामुळे गत तीन महिन्यांपासून ते अस्वस्थ असून बाधितांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना आर्जव करतायत.

कारण... राजकारण..!

मिरगाव गावातील मोकळे प्लॉट असलेल्या तसेच घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून निवारा शेड देण्यात आली आहेत. मात्र, धोंडीराम बाकाडे यांना शेडही दिले गेलेले नाही. केवळ राजकीय आणि वैयक्तिक द्वेषापोटी बाधितांच्या यादीतून नाव वगळले असल्याचा आरोप बाकाडे यांनी केला आहे.

मिरगावमध्ये माझे वडिलोपार्जित घर होते. मात्र, घर पूर्णपणे पडल्यामुळे ‘आठ अ’ उताऱ्यावर मोकळी जागा असा उल्लेख येतो. गावातील अन्य काही मोकळे प्लॉट असलेल्या ग्रामस्थांना निवारा शेड मिळाली आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा आहे. मात्र, बाधितांच्या यादीत माझे नावच नसल्यामुळे मला कसलाच लाभ मिळालेला नाही. - धोंडीराम बाकाडे, दरडग्रस्त, मिरगाव

मिरगावचा लेखाजोखा

५३१ : लोकसंख्या

१४६ : एकूण घरे

४० : पूर्णत: बाधित घरे

८ : अंशत: बाधित घरे

११ : दरडीखाली मृत

पूर्णत: बाधितांना...

दुर्घटनेतील पूर्णत: बाधित कुटुंबांना दीड लाख रुपये मदत व दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे.

मयताच्या वारसांना...

१) राज्य शासनाकडून पाच लाख रुपये मदत देण्यात आली आहे.

२) केंद्र शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

३) गोपींनाथ मुंडे अपघाती योजनेतून दोन लाख मिळणार आहेत. 

धोंडीराम बाकाडे यांचे राहते घर मिरगावमध्ये नव्हते. त्यांचे कुटुंबीय नेचल गावामध्ये राहतात. त्यामुळे त्यांना निवारा शेडची आवश्यकता आहे, असे वाटत नाही. तसेच त्यांच्या नुकसानीचे कसलेही पुरावे आमच्यासमोर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना मदत मिळालेली नाही. - तलाठी, मिरगाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस