शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 16:14 IST

जेष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन झाले आहे. त्या 102 वर्षाच्या होत्या.

सातारा - ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 102 वर्षाच्या होत्या. वाईच्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यमुनाबाईंना कलेतील योगदानामुळे भारत सरकारने 2012मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 

अल्प परिचय - (जन्म 31 डिसेंबर 1915)यमुनाबाईंचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे होते. त्या राहात असलेली वाईची कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे लोककलेचे माहेरच होते. यमुनाबाई दहा वर्षांच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर जाऊ लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.

लोकनाट्यातून नाटकांकडे - अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

पुरस्कार - - यमुनाबाईंना मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय देवी अहिल्या सम्मान हा इ.स. 1999-2000 सालचा पुरस्कार मिळाला.(एक लाख रुपये रोख + प्रशस्तीपत्र वगैरे)- यमुनाबाईंना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार 2012 साली मिळाला. - संगीत नाट्य अकादमीचा रवींद्रनाथ टागोर रत्न पुरस्कार (2012) (३ लाख रुपये रोख + वगैरे)- संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' 2012 सालचा लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दिला गेला.  

यमुनाबाई वाईकर यांचं जीवनचरित्र प्रभाकर ओव्हळ यांनी शब्दबद्ध केलं. 'लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर’ या नावाने लिहिलेल्या चरित्राचा मुंबई विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. लावणी क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना 2016 मध्ये ‘लोकमत’ने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. 

लावणी गाताना त्यांची अदाकारी विशेष होती. त्यांचा माझा चांगला परिचय होता . त्यांच्या जाण्याने लावणी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली आहे.