शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

लामजचा पाऊस दहा हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:33 IST

बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

बामणोली : मागील महिन्यात मान्सूनच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होता. पावसाने उघडीप घेतली असली तरी साताऱ्याच्या पश्चिमेला असलेल्या लामजमध्ये अजून संततधार सुरू आहे. मागील १०८ दिवसांमध्ये गावात १० हजार २३९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गावातील उत्तेश्वर पद्मावती मंदिराचा ४० फूट उंचीचा कळस जमीनदोस्त झालासातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून बºयाच ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी लामज गावात अजूनही तो जोरदार कोसळतच आहे.लामज हे गाव सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला कोयना जलाशयाच्या काठावर महाबळेश्वर तालुक्यात आहे. सुमारे ९० घरांच्या उंबऱ्यांचे व साधारण ४०० लोकसंख्येचे दुर्गम खेडेगाव आहे. हे गाव कांदाटी खोºयात असून, या गावात जाण्यासाठी बामणोली येथून लाँचने सुमारे दीड तास वेळ लागतो. जिल्हा परिषदेची लाँच या गावात जाते. दुसरीकडून तापोळा येथून तराफ्यात गाडी घेऊन पलीकडून गाढवलीमार्गे कच्च्या रस्त्याने जाता येते.लामज या गावात १ जून ते १६ सप्टेंबर या १०८ दिवसांत वरुणराजा १० हजार २३९ मिलिमीटर एवढा बरसला आहे. या गावात दोन वर्षांपूर्वी बसविलेल्या पर्जन्यमापकावर तशी नोंद झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने कच्चा रस्ताही वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या ग्रामस्थांना पाण्यातून लाँचनेच प्रवास करावा लागतो. तसेच पावसाने परिसरातील विजेचे खांब पडल्याने गाव अंधारातच आहे. तर दुसरीकडे उत्तेश्वर येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर तर जून महिन्यापासून बंद आहे.