शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

‘कृष्णा’, ‘कोयना’ धोकापातळीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:01 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नद्यांतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.गेल्या १५ दिवसांपासून पश्चिम भागात सतत हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून अक्षरश: कहर केला असून, पश्चिम भागातील लोकांचा संपर्क तुटल्यातच जमा आहे. रस्त्यात झाडे पडणे, घाटात दरड कोसळणे, ओढे, नाले दुथडी भरून वाहने आणि वरून धो-धो पाऊस यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन गेले आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबर पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नुकसानीच्या घटनांत वाढ झाली आहे.या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच धरणामध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. कोयना धरणात तर सध्या एक लाख क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील साठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६५ हजार ८१३ व पायथा वीजगृहातून २१०० असा ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तर कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी धोक्याकडे वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना केली आहे.नदीची धोकापातळी अशी...कृष्णा नदीची सातारा शहराजवळील संगम माहुली येथे धोका पातळी ६२६ मीटर आहे. रविवारी सकाळी ही पातळी ६१८ मीटरवर होती. तसेच कºहाडात ५६७ मीटरवर धोका पातळी असून, सध्या तेथील पाणी ५५९ मीटरवर आहे. कोयना नदीची धोका पातळी ५६५ मीटर असून सध्या पातळी ५६३ मीटर आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.शाळेची भिंत आठ दुचाकींवर पडलीकºहाड येथील लाहोटी कन्या शाळेची धोकादायक संरक्षक भिंत रविवारी मुसळधार पावसामुळे दुपारी कोसळली. यामध्ये तब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.