शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘कृष्णा’, ‘कोयना’ धोकापातळीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:01 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नद्यांतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.गेल्या १५ दिवसांपासून पश्चिम भागात सतत हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून अक्षरश: कहर केला असून, पश्चिम भागातील लोकांचा संपर्क तुटल्यातच जमा आहे. रस्त्यात झाडे पडणे, घाटात दरड कोसळणे, ओढे, नाले दुथडी भरून वाहने आणि वरून धो-धो पाऊस यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन गेले आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबर पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नुकसानीच्या घटनांत वाढ झाली आहे.या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच धरणामध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. कोयना धरणात तर सध्या एक लाख क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील साठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६५ हजार ८१३ व पायथा वीजगृहातून २१०० असा ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तर कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी धोक्याकडे वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना केली आहे.नदीची धोकापातळी अशी...कृष्णा नदीची सातारा शहराजवळील संगम माहुली येथे धोका पातळी ६२६ मीटर आहे. रविवारी सकाळी ही पातळी ६१८ मीटरवर होती. तसेच कºहाडात ५६७ मीटरवर धोका पातळी असून, सध्या तेथील पाणी ५५९ मीटरवर आहे. कोयना नदीची धोका पातळी ५६५ मीटर असून सध्या पातळी ५६३ मीटर आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.शाळेची भिंत आठ दुचाकींवर पडलीकºहाड येथील लाहोटी कन्या शाळेची धोकादायक संरक्षक भिंत रविवारी मुसळधार पावसामुळे दुपारी कोसळली. यामध्ये तब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.