शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

कोयनेच्या सिंचन अन् वीजनिर्मिती पाणी वापराला कात्री; कमी पाणीसाठ्याचे कारण 

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 21:13 IST

याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

सातारा : जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरणही भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जून रोजी धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता. तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलीमीटरची तूट आणि आवाकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली. त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. यामधील दि. १ जुलै ते १४ ऑक्टोबरदरम्यान खरीप हंगामात ४.३९ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे.

कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी विसर्ग करण्यात येतो. मागीलवर्षी खरीप हंगामात पाणीवापर ०.४७ टीएमसी इतका मर्यादित होता. मात्र, यावर्षी खरीपात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सांगली सिंचनकडून मागणी करण्यात आली. त्यामुळे धरणातून २.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीपेक्षा २ टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या धरणातच पाणी कमी असल्याने याचा परिणाम रब्बी आणि उन्हाळी हंगाम सिंचनावर होणार आहे. 

परिणामी पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. त्यापैकी सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याबाबत सूचना केलेली आहे.

             कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ आणि १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. मात्र, कपातीनुसार दोन्ही हंगामामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. यामधून सातारा जिल्ह्यासाठी ३ आणि सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर होणार आहे.

मार्चमध्ये पाणी वापराचे फेरनियोजन...कमी पर्जन्यमानामुळे धरणामधील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्यासह सिंचन व विजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पुढीलवर्षी जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाणी आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी रब्बी हंगामातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करुन मार्चमध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली. 

टॅग्स :Damधरण