शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

कोयनेच्या सिंचन अन् वीजनिर्मिती पाणी वापराला कात्री; कमी पाणीसाठ्याचे कारण 

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 21:13 IST

याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

सातारा : जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरणही भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जून रोजी धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता. तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलीमीटरची तूट आणि आवाकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली. त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. यामधील दि. १ जुलै ते १४ ऑक्टोबरदरम्यान खरीप हंगामात ४.३९ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे.

कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी विसर्ग करण्यात येतो. मागीलवर्षी खरीप हंगामात पाणीवापर ०.४७ टीएमसी इतका मर्यादित होता. मात्र, यावर्षी खरीपात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सांगली सिंचनकडून मागणी करण्यात आली. त्यामुळे धरणातून २.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीपेक्षा २ टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या धरणातच पाणी कमी असल्याने याचा परिणाम रब्बी आणि उन्हाळी हंगाम सिंचनावर होणार आहे. 

परिणामी पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. त्यापैकी सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याबाबत सूचना केलेली आहे.

             कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ आणि १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. मात्र, कपातीनुसार दोन्ही हंगामामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. यामधून सातारा जिल्ह्यासाठी ३ आणि सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर होणार आहे.

मार्चमध्ये पाणी वापराचे फेरनियोजन...कमी पर्जन्यमानामुळे धरणामधील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्यासह सिंचन व विजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पुढीलवर्षी जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाणी आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी रब्बी हंगामातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करुन मार्चमध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली. 

टॅग्स :Damधरण