शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By दीपक शिंदे | Updated: September 21, 2022 16:37 IST

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कोयनानगर (सातारा): महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण आज, बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तसेच धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.कोयना धरण बुधवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला आहे. पाणीपातळी २१६३.०६ फूट झाली असून, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळेच ११ सप्टेंबरपासून पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अजूनही तो विसर्ग सुरूच आहे; तर १३ सप्टेंबर रोजी सहा वक्री दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामध्ये वारंवार बदल करून पाणीपातळी नियंत्रित करण्यात आली.आज, पुन्हा दुपारी २ वाजता सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून ९४६३ क्युसेक व पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक असा कोयना नदीपात्रात एकूण १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला...कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या धरणातील पाणीसाठ्यावर या तिन्ही राज्यांचे लक्ष लागून असते. धरण पूर्ण क्षमतेने भरले की त्याचा तिन्ही राज्यांना फायदा होत असतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी