शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कोरेगावचा नवीन विकास आराखडा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

कोरेगाव : कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटून गेली तरी, अद्याप नवीन विकास योजना अस्तित्वात आलेली नाही. ग्रामपंचायत ...

कोरेगाव : कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटून गेली तरी, अद्याप नवीन विकास योजना अस्तित्वात आलेली नाही. ग्रामपंचायत काळात १९८९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विकास योजनेवर सद्यस्थितीत कामकाज सुरू असल्याने नागरिकांसह विविध क्षेत्राला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हद्दवाढीसह नवीन शहर विकास आराखडा राजकीय उदासीनतेमुळे रखडला असल्याची चर्चा आहे.

शहराची हद्द मर्यादित असून, जुन्या गावठाणापर्यंतच सिटी सर्व्हे विभागाची सीमारेषा आहे. त्यातच १९८९ साली कोरेगावसाठी नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने विकास योजना लागू केली. त्यावेळी तिला ‘बिगर नगरपरिषद’ असे गोंडस नाव देखील देण्यात आले. या योजनेतून शहराच्या विविध विभागात ५४ आरक्षणे टाकण्यात आली, मात्र आजअखेर एकही आरक्षण अस्तित्वात आलेले नाही.

दि. ५ मार्च २०१६ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नवनियुक्त नगरसेवकांनी एकमुखी ठराव करून नवीन शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी खासगी संस्थेला काम सोपविले, त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देखील पुरविले. मात्र काही केल्या या संस्थेकडून आराखडा तयार करण्याचे काम पूर्णत्वास जात नाही. नगरपंचायतीने मध्यंतरीच्या काळात ठराव करून, या संस्थेच्या कामकाजास मुदतवाढ देखील दिलेली होती. मात्र अद्यापपर्यंत कामकाज सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. १९८९ सालानंतर शहराचा चारीही बाजूला विकास झालेला आहे. शहरालगत शेतीक्षेत्रामध्ये वसाहती उभ्या राहिल्या आहेत. सुलतानवाडी, कुमठे, न्हाळेवाडी-एकसळ, गोळेवाडी गावांपर्यंत वसाहती व उपनगरे तयार झालेली आहेत.

नगरपंचायत अस्तित्वात आणताना शासनाने या सर्व परिसराचा नगरपंचायत हद्दीत समावेश केला आहे. मात्र आजही या क्षेत्रांमध्ये ७/१२ उतारा कायम आहे. या क्षेत्रांचा सिटी सर्व्हे विभागात समावेश झालेला नसल्याने प्रॉपर्टी कार्डपासून कित्येक हात लांब शहरवासीय आहेत. शहर विकास आराखडा नव्याने तयार न झाल्याने नव्याने झालेल्या आणि होऊ घातलेल्या बांधकामांना प्रशासकीय पातळीवर परवानगी मिळणे अवघड बनले आहे. बहुतांश क्षेत्र हे हरितपट्ट्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँका देखील आपल्या नियमावलीमध्ये बसत नसल्याचे कारण देऊन गृहप्रकल्पांना कर्जे नाकारत आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी वित्तीय संस्थांकडे धाव घ्यावी लागत आहे.

(चौकट)

आरक्षणे रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार

शहरात ५४ आरक्षणे टाकण्यात आलेली असली तरी, प्रत्यक्षात २७ आरक्षणांची ७/१२ उताऱ्यांवर २००२ साली नोंद करण्यात आली आहे. ही प्रक्रिया देखील नियमबाह्य झालेली आहे. जाणकार लोक याबाबत आता न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असून, केवळ एक-दोन नव्हे, तर संपूर्ण शहर विकास आराखडा कालबाह्य झाल्याने तो रद्द करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत एक व्यापक बैठक नुकतीच झालेली आहे. एप्रिल महिन्यात न्यायालयात दावा दाखल केला जाणार असल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले.