शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावचा नवीन विकास आराखडा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

कोरेगाव : कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटून गेली तरी, अद्याप नवीन विकास योजना अस्तित्वात आलेली नाही. ग्रामपंचायत ...

कोरेगाव : कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटून गेली तरी, अद्याप नवीन विकास योजना अस्तित्वात आलेली नाही. ग्रामपंचायत काळात १९८९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विकास योजनेवर सद्यस्थितीत कामकाज सुरू असल्याने नागरिकांसह विविध क्षेत्राला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हद्दवाढीसह नवीन शहर विकास आराखडा राजकीय उदासीनतेमुळे रखडला असल्याची चर्चा आहे.

शहराची हद्द मर्यादित असून, जुन्या गावठाणापर्यंतच सिटी सर्व्हे विभागाची सीमारेषा आहे. त्यातच १९८९ साली कोरेगावसाठी नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाने विकास योजना लागू केली. त्यावेळी तिला ‘बिगर नगरपरिषद’ असे गोंडस नाव देखील देण्यात आले. या योजनेतून शहराच्या विविध विभागात ५४ आरक्षणे टाकण्यात आली, मात्र आजअखेर एकही आरक्षण अस्तित्वात आलेले नाही.

दि. ५ मार्च २०१६ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नवनियुक्त नगरसेवकांनी एकमुखी ठराव करून नवीन शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी खासगी संस्थेला काम सोपविले, त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देखील पुरविले. मात्र काही केल्या या संस्थेकडून आराखडा तयार करण्याचे काम पूर्णत्वास जात नाही. नगरपंचायतीने मध्यंतरीच्या काळात ठराव करून, या संस्थेच्या कामकाजास मुदतवाढ देखील दिलेली होती. मात्र अद्यापपर्यंत कामकाज सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे. १९८९ सालानंतर शहराचा चारीही बाजूला विकास झालेला आहे. शहरालगत शेतीक्षेत्रामध्ये वसाहती उभ्या राहिल्या आहेत. सुलतानवाडी, कुमठे, न्हाळेवाडी-एकसळ, गोळेवाडी गावांपर्यंत वसाहती व उपनगरे तयार झालेली आहेत.

नगरपंचायत अस्तित्वात आणताना शासनाने या सर्व परिसराचा नगरपंचायत हद्दीत समावेश केला आहे. मात्र आजही या क्षेत्रांमध्ये ७/१२ उतारा कायम आहे. या क्षेत्रांचा सिटी सर्व्हे विभागात समावेश झालेला नसल्याने प्रॉपर्टी कार्डपासून कित्येक हात लांब शहरवासीय आहेत. शहर विकास आराखडा नव्याने तयार न झाल्याने नव्याने झालेल्या आणि होऊ घातलेल्या बांधकामांना प्रशासकीय पातळीवर परवानगी मिळणे अवघड बनले आहे. बहुतांश क्षेत्र हे हरितपट्ट्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँका देखील आपल्या नियमावलीमध्ये बसत नसल्याचे कारण देऊन गृहप्रकल्पांना कर्जे नाकारत आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी वित्तीय संस्थांकडे धाव घ्यावी लागत आहे.

(चौकट)

आरक्षणे रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार

शहरात ५४ आरक्षणे टाकण्यात आलेली असली तरी, प्रत्यक्षात २७ आरक्षणांची ७/१२ उताऱ्यांवर २००२ साली नोंद करण्यात आली आहे. ही प्रक्रिया देखील नियमबाह्य झालेली आहे. जाणकार लोक याबाबत आता न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असून, केवळ एक-दोन नव्हे, तर संपूर्ण शहर विकास आराखडा कालबाह्य झाल्याने तो रद्द करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत एक व्यापक बैठक नुकतीच झालेली आहे. एप्रिल महिन्यात न्यायालयात दावा दाखल केला जाणार असल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले.