शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलात ‘कौलारू’ घरांची पडझड

By admin | Updated: May 8, 2015 00:19 IST

शाकारणी झाली कालबाह्य : कारागिरांचा ग्रामीण भागात तुटवडा ; तुटपुंज्या मजुरीमुळे मजुरांची व्यावसायाकडे पाठ

संतोष गुरव - कऱ्हाड -पावसाळा येण्यापूर्वी घरांची डागडुजी करण्याचे काम सध्या ग्रामीण तसेच शहरी भागात केले जात आहे. यामध्ये कुणी घरांचे पत्रे, तर कुणी घरावरील स्लॅबची डागडुजी करत आहेत. नव्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या घरांची डागडुजी करण्यासाठी गवंडी व इंजिनिअर मिळत आहे. मात्र जुन्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या कौलारू घरांच्या शाकारणीसाठी शाकारणी करणारे कारागिर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील कौलारू घरांची शाकारणी व डागडुजीअभावी पडझड होत आहे.पावसाळ्यात छतांतून पाणी गळू नये म्हणून कौलारू घरांना शाकारणी केली जाते. ग्रामीण भागात पूर्वी दगड अन् मातीच्या साह्याने बांधण्यात आलेल्या घरांवर घाणेरीच्या झाडापासून व ताटी लावून तयार करण्यात आलेले छप्पर घातले जात असत. त्या घरांची आजही अवस्था मजबूत स्थितीत असल्याचे पाहावयास मिळते. घाणेरीच्या झाडापासून तयार करण्यात आलेल्या छप्परावर बारीक सुपाच्या आकाराची कौले बसवण्यात आल्यानंतर घराला शोभा येत असत. त्याकाळी प्रामुख्याने सर्वत्र अशा छप्पराच्या घरांचे बांधकाम केले जात असे.ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी बारीक सुपाच्या आकाराच्या कौलांचा वापर केला जाई. मात्र, दर चार-पाच वर्षांनी या कौलारू घरांच्या छतांची डागडुजी करावी लागत, तसेच छतावर पडलेले छिद्रे मुजविण्याचे काम केले जात असत. या कामासाठी ठराविक कारागिरांना त्या काळात जास्त मागणी असे. आता त्या काळातील कारागिरांचे वय झाल्याने त्यांचे काम करणाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आताच्या काळातील कौलारू घरे पाडण्याचा इंजिनिअरकडून सल्ला दिला जात आहे. तर त्या जागी सिमेंट अन् विटांपासून बंगले बांधले जात आहे. सिमेंट अन् विटांपासून बांधण्यात आलेल्या घरांना खर्चही जास्त प्रमाणात लागत असल्याने पैसे जास्त मोजून इंजिनिअर यांच्याकडून बंगले बांधले जात आहे.माती व दगडापासून बांधण्यात आलेल्या घरांची अनेकवेळा भूूकंपामुळे पडझड होते. तर त्याकाळी कारागिरांकडून बांधण्यात आलेली भूकंपरोधक इमारती आजही ग्रामीण भागात चांगल्या स्थितीत आहेत. भूकंप असो, अथवा पावसाळा. या दिवसात टिकू न राहणाऱ्या कौलारू घरांच्या शाकारणीसाठी खर्चही कमी येतो. एक ते दोन कारागिरांकडून कौलारू घरांची शाकारणी करण्याचे काम पूर्वी के ले जात असत. आज त्याचे प्रमाण कमी झाले आहे. जुन्या काळातील शाकारणी करणारे आज थकलेले असून, त्यांच्या पिढीतील कु णी शासकीय तर कुणी खासगी नोकरीत कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण लोकांचे हाल होत आहेत.असा होता पूर्वी शाकारणीचा दरपूर्वीच्या काळात कौलारू घरांच्या शाकारणीबरोबर दगड, मातीच्या साह्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या शाकारणीसाठी शंभर ते दोनशे रूपये असा दर होता. त्याकाळात एक शाकारणी कारागिरांच्या हाताखाली दोन कामगार काम करत असत. तर त्यांना मदत करण्यासाठी घरांतील लोक येत असत.अशी करतात कौलारू घरांची शाकारणीकौलारू घरांची शाकारणी करताना ज्या घराची शाकारणी करावयाची आहे. त्यासाठी लागणारे घाणेरीचा झाडू व ताटीपासून छप्पर तयार केले जाते. त्यासाठी लाल मातीच्या साह्याने तयार करण्यात आलेली कौले त्या छप्परावर एकसारख्या ओळीत बसवली जातात. बारीक सुपाच्या आकारात तयार केलेली कौले ही कारागिर कुशलतापूर्वक घराच्या छतावर बसवतात त्यातून पावसाळ्यात पाण्याची गळती होणार नाही याची काळजी घेतली जाते. हे काम कौशल्याचे असल्याने ते ग्रामीण भागातही मोजक्याच लोकांना येत आहे.अनुभवाचे शाकारणी कौशल्यज्या पद्धतीने आजच्या काळात अनेक मोठमोठ्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून इमारत बांधकामाचे अद्ययावतपणे कौशल्य दिले जाते. तर त्यासाठी महागड्या फीची आकारणी केली जाते. त्यातून विद्यार्थी बांधकामाची पदवी घेऊन इमारती बांधतात. याउलट जुन्या काळातील शाकारणी कारागिर आपल्या वर्षानुवर्षाच्या अनुभवाच्या आधारावर कुशलतापूर्वक कौलारू घरांचे बांधकाम व शाकारणी करतात.मॉडर्न घरांना कौलांची सजावटबदलत्या काळानुसार दगड, मातीपासून बांधण्यात आलेली घरे कालबाह्य झाली आहेत. तर आताच्या काळात बेंगलोर पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट अन् वाळूच्या घरांच्या सजावटीसाठी लाल रंगाच्या कौलांचा वापर केला जात आहे. कौलांच्या वापरामुळे या घरांना वेगळी शोभा प्राप्त होत आहे.