शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

साताऱ्यात चक्क घोड्याचे वर्षश्राद्ध कोडोलीत कार्यक्रम : काटे-देशमुखांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात जेवली दोन हजार माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 19:59 IST

माणूस गेल्यानंतर त्याचे श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्या समाजात रुढ आहे. घरातला जीवलग अचानकपणे निघून गेल्यानंतर कुणालाही दु:ख होते. मग तो घरातला पाळीव प्राणी का असेना!

भोलेनाथ केवटे/सातारा : माणूस गेल्यानंतर त्याचे श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्या समाजात रुढ आहे. घरातला जीवलग अचानकपणे निघून गेल्यानंतर कुणालाही दु:ख होते. मग तो घरातला पाळीव प्राणी का असेना! सातारा शहराजवळच्या कोडोली गावात राहणाऱ्या काटे-देशमुखांनाही सांभाळलेला घोडा निघून गेल्याचा चटका लागून राहिला. दि. ४ जुलै रोजी या घोड्याचे चक्क वर्षश्राद्धही त्यांनी घातले.

प्राणीमात्रांवर दया करावी, अशी आपली संस्कृती सांगते. आपण तसे करतोही; पण घरातल्या एका पाळीव प्राण्यावर इतके प्रेम करतो का? की जेव्हा त्याचा मृत्यू होऊनही वर्षानुवर्षे त्याचे दु:ख बोचत राहील? हो कोडोलीतल्या काटे-देशमुख कुटुंबानेही आपल्या काळजाचा तुकडा असलेला चेतक नावाचा घोडा गतवर्षी गमावला. हे कुटुंब अजूनही दु:खावेगात आहे.एखाद्या प्राण्याबरोबर जर आपलं नातं तयार झालं तर ते कधीही तुटत नाही, उलट ते अधिक दृढ होतं. भले तो आपल्याला सोडून जाऊ द्या; पण त्याच्याप्रती आपलं प्रेम, माया कधीच कमी होत नाही. याची प्रचिती साताºयात दिसून आली. सातारा येथील कोडोली परिसरातील काटे कुटुंबीयांनी त्यांच्या चेतक नामक घोड्याचे वर्षश्राद्ध घातले आहे. डबल महाराष्ट्र केसरी असणारा चेतक घोडा नाचकामाच्या कलेमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मात्र गेल्यावर्षी चेतकचे निधन झाले. त्यामुळे त्याचे बुधवार, दि. ४ जुलै रोजी वर्षश्राद्ध घालण्यात आले.

चेतकला लग्न शुभकार्यासाठी खूप मागणी होती. अकलूज व पुणे येथे झालेल्या घोड्यांच्या भव्य नाचकाम स्पर्धेमध्ये ‘चेतक’ने प्रथम क्रमांक मिळविला होता. सूरज काटे-देशमुख आणि कुटुंबीयांनी चेतकचा घरातील सदस्याप्रमाणे सांंभाळ केला होता आणि त्याचे वर्षश्राद्धसुद्धा अगदी विधिवत केले. जवळपास दीड ते दोन हजार माणसं चेतकच्या वर्षश्राद्धसाठी आली होती. यानिमित्त काटे-देशमुख कुटुंबीयांनी या सर्वांची जेवणाचीसुद्धा व्यवस्था केली होती. काटे-देशमुख यांच्याकडे राजा आणि पिंट्या अशी अजून दोन घोडी आहेत. यांनाही लग्नकार्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.अज्या अन् शीतलीच्या लग्नातसुद्धा यांचेच घोडेसध्या प्रसिद्ध असलेली मालिका म्हणजे लागिरं झालं जी. यात मध्यंतरी अज्या अन् शीतलीचं लग्न झालं. यातसुद्धा काटे-देशमुख कुटुंबीयांचा राजा आणि पिंट्या नामक घोडे वरातीसाठी होते. त्यामुळे या दोन्ही घोड्यांनासुद्धा लग्नकार्यात मागणी आहे.विविध ठिकाणांहून अश्वप्रेमी उपस्थितचेतकने सर्वांच्या मनात एक नातं तयार केलं होतं, त्यामुळे त्याच्या वर्षश्राद्धादिवशी अकलूज, सोलापूर, पुणे, बीड आदी जिल्'ांतून मोठ्या संख्येने अश्वप्रेमी उपस्थित राहिले होते. 

आमचा चेतक हा सर्वांच्या मनावर राज्य करणारा होता. जर एखाद्याच्या लग्नाच्या तारखेदिवशी चेतक घोडा उपलब्ध नसेल तर हाच घोडा पाहिजे म्हणून ‘चेतक घोडा कोणत्या तारखेला बुक नाही ते सांगा त्या तारखेला आम्ही लग्न घेऊ,’ असे म्हणून लग्नाची तारीखही पुढे ढकलतात.-सूरज काटे-देशमुख 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू