शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जानकर जिल्ह्यातील तेरावे आमदार!

By admin | Updated: January 20, 2015 23:43 IST

घटक पक्षाला न्याय : हक्काचा ‘लाल दिवा’ मिळण्याची शक्यता बळावली

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतल्या जागावाटपाच्या समन्वयामुळे जानकर आमदार होणार, हे निश्चित असल्याने सातारा जिल्ह्याच्या आमदारांचा आकडा आता तेरा होणार आहे.जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत विधानसभेचे आठ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. विधानसभेला राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे (कोरेगाव), शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा-जावळी), मकरंद पाटील (वाई-खंडाळा-महाबळेश्वर), दीपक चव्हाण (फलटण), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड उत्तर) हे पाच आमदार, तर काँगे्रसचे पृथ्वीराज चव्हाण (कऱ्हाड दक्षिण), जयकुमार गोरे (माण-खटाव) हे दोन आमदार व शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) हे एकमेव आमदार असे बलाबल आहे. तर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर, प्रभाकर घार्गे, नरेंद्र पाटील व काँगे्रसचे आनंदराव पाटील हे जिल्ह्याच्यावतीने प्रतिनिधीत्व करत आहेत.शिवसेनेने पुरंदचे आमदार विजय शिवतारे यांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिल्याने सध्याच्या परिस्थितीत शिवतारेंचा वारु वेगात आहे. आमदार शंभूराज देसाई यांना शिवतारेंचे पाठबळ लाभले असल्याने सध्या काँगे्रस व राष्ट्रवादीच्या दहा आमदारांविरोधात शिवसेनेच्या या दोन धुरंधरांची राजकीय कुस्ती लागलेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँगे्रसची शक्ती मोठी असतानाही राज्य व केंद्रातील सत्तेमुळे पालकमंत्री विजय शिवतारे व आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हयावर वचक मिळविण्याची रणनीती आखली आहे. साताऱ्याचा अभिनव विकास करुन दाखविणार, हे वाक्य शिवतारे यांनी घोटून घेतले असल्याने साहजिकच जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांत ते वारंवार या वाक्याचा वापर करत आहेत. दरम्यान, कोयना प्रकल्पातील वाढीव वीज निर्मिती, शासकीय मेडिकल कॉलेज व जिहे-कटापूर पाणी योजना पूर्ण करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार दिसत आहे. दरम्यान, या परिस्थितीमध्ये महादेव जानकर यांना विधानपरिषदेमार्फत मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याने जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढणार आहे. याचा फायदा जिल्ह्याला भविष्यात नक्की होईल, असे चित्र सध्या तरी निर्माण झालेले आहे. (प्रतिनिधी)अंगणात मंत्रिपद...शिवारात पाणी!महायुतीतील घटक पक्ष म्हणून ‘रासप’ला हक्काचे मंत्रिपद मिळणार आहे. साहजिकच महादेव जानकरांच्या रुपाने माण-खटावच्या अंगणात मंत्रिपद चालून आल्याने आता शिवारातही पाणी खेळेल, अशी आशा दुष्काळग्रस्तांमध्ये निर्माण झाली आहे.