शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

खोतांची खिल्ली तर शेट्टींची शिट्टी!

By admin | Updated: December 4, 2014 23:37 IST

कऱ्हाडात मोर्चा : ‘बळीराजा’ संघटनेने केले ‘स्वाभिमानी’ संघटनेला लक्ष्य

कऱ्हाड : ऊसदरासाठी आक्रमक झालेल्या बळीराजा शेतकरी संघटनेने कऱ्हाडात काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लक्ष्य केले. यामध्ये खोतांची खिल्ली उडविली गेली तर शेट्टींची शिट्टी वाजविली गेली.मोर्चात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, राज्याध्यक्ष सत्तार पटेल, प्रवर्तक बी. जी. पाटील, राज्य उपाध्यक्ष नितीन बागल, नितीन पाटील, पाशा पटेल, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वडले, संजय पाटील, चंद्रकांत यादव यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेच्या नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली़ बी. जी. पाटील म्हणाले, ‘सध्याच्या राज्यकर्त्यांना, सरकारला इंग्रजांप्रमाणे मस्ती आली आहे. आत्ताचा दराचा कायदा हा नपुंसक कायदा म्हणून अस्तित्वात आला आहे. या जगात जगणाऱ्याला समान न्याय दिला पाहिजे. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा तुमच्या नावात ‘चंद्र’ आहे, म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना ‘चंद्र’ दाखवत आहात काय ? असा सवालही त्यांनी केला़ आता महायुतीचे सरकार आले आहे. त्यांच्याशी निवडणूकीत शेट्टी-सदाभाऊंनी साटलोट करून आत ते मंत्रालयात जाऊन बसले आहेत़ ऊसदराबाबत गेल्यावर्षी ओरडून बोलणारे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आज तोंड बंद करून का आहेत ? शेट्टी दिल्लीत तर सदाभाऊ राज्यात बसून ऊसदराचे निर्णय काय घेणार? मंत्रालयात सह्याद्री कारखान्याच्या एसी केबिनमध्ये बसून या दोघांनी आज साखरेचा दर हाणला आहे. साखरेच्या पोत्यांवर आज बॅच व तारीख का लावली जात नाही? दारूच्या बाटलीवर ती कशी लावली जाते. त्याची चौकशी का केली जात नाही? उसाचा दर ठरवला नाही तर आता तुमची काय खैर नाही़ चंद्रकांत दादा फडणवीसांना विचारा की विरोधी पक्षात असताना काय बोलत होता़ वजनकाटे आॅनलाईन करा़ आता काय झाले? बऱ्या बोलाने आता सांगतोय पैस आमचा व चैनी तुमच्या हे सहन होणार नाही़ शंकरराव गोडसे म्हणाले, बळीराजा शेतकरी संघटना ही राजकीय बंधने नसणाऱ्या लोकांची असून जो शेतकऱ्यांच्या अन्नात विष कालवेल त्याला कधीच सोडणार नाही़ मग तो सदाभाऊ खोत असो व राजू शेट्टी़ ३२ गुंठे जमीन असणारे सदाभाऊ खोत हे अडीच कोटींचा बंगला कसा बांधू शकतात, याची चौकशी झालीच पाहिजे. आज सदाभाऊंना राज्यमंत्रीपद मिळणार आहे म्हणून ते बोलत नाहीत़ असा टोलाही त्यांनी लगावला़ पंजाबराव पाटील म्हणाले, बळीराजा संघटनेची स्थापना ही अराजकीय पदधतीने केली असून या मोर्चातून संघटनेचे पहिले बारसे घातले आहे. आज सर्वत्र पाहिले की आत्महत्यांच्याच घडामोडी दिसतात. अच्छे दिन दाखवणारे काय करत आहेत. ज्या नेत्यांनी उसाचे आंदोलन करण्यासाठी आपला वापर केला ते आज लाल दिव्याच्या गाडीतून फिरत आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, कृपा करून आत्महत्या करू नका. संघटनेला साथ द्या. येत्या दहा दिवसांत एकरकमी दर जाहीर नाही केला तर असहकार पद्धतीने आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही़ (प्रतिनिधी)‘सह्याद्री’त बसून खोत-शेट्टींचे अभंगमुंबईत ‘सह्याद्री’त बसून राजू शेट्टी व सदाभाऊ खोत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे ‘आता नाही येणे जाणे...’, अशाच पद्धतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपले गाऱ्हाणे ऐकविण्याचे काम करत आहेत. ते काय आता ऊसदरावर आंदोलन करणार, अशी टीका बी. जी. पाटील यांनी करताच आंदोलकांनी त्याला प्रतिसाद दिला़