शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने ...

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने बाजरीबरोबर कडधान्य, तेलबियांची पेरणी झाली; पण पिके बहरत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा आहे; पण निसर्गाचे ऋतूचक्र बदलल्याने व धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाण्याची दोन आर्वतने वर्षातून सुटतात; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. कोरोनामुळे गत वर्षापासून रास्त भाव दुकानातून धान्य मोफत मिळत असल्याने बाजरी, ज्वारीला बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांकडे धान्य पडून आहे. बाजारात बाजरीला १,२०० ते १,४०० रुपये क्विंटलचा दर असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरवून कडधान्य घेवडा, मूग, चवळी तर तेलबिया सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली. पेरणीवेळी पर्जन्यमान चांगले राहिल्याने उगवण चांगली झाली. पिके जोमदार आली; पण आंतरमशागतीनंतर खते देताना युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांना वेळेत नत्र न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली.

आता बाजरी फुलोऱ्यात तर सोयाबीन, भुईमूग, शेंगाही फुलोऱ्यात आहेत. सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने घेवडा, मूग, चवळीची फूलगळ होऊन पिके सुकू लागल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी प्रथमच पीक पद्धतीमध्ये बदल करून तेलवर्गीय पिकाकडे शेतकरी वळला. कडधान्य पिके पावसाच्या पाण्यावर चांगली येतात. धोम-बलकवडी कालव्याला पाणी सोडले आहे; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने शेताच्या बांधावर पाणी जात नाही. त्यासाठी विद्युत मोटारीने पाईपलाईनद्वारे पाणी पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हाती थोडीफार पिके लागतील. नाहीतर खरीप हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

(कोट..)

शेतकऱ्याच्या धान्य, भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असताना खते, इंधन, वीज यांचे दर वाढले. आता शेतकऱ्याने खरीप हंगामातील मशागत, पेरणी, बी-बियाणे, खते यावर लाखो रुपये खर्च केला. पिके हाताला लागतेवेळी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाणार आहे.

- त्र्यबंकराव बोबडे, बिबी, फलटण

१३ आदर्की

फोटो - आदर्की परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)