शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने ...

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने बाजरीबरोबर कडधान्य, तेलबियांची पेरणी झाली; पण पिके बहरत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा आहे; पण निसर्गाचे ऋतूचक्र बदलल्याने व धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाण्याची दोन आर्वतने वर्षातून सुटतात; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. कोरोनामुळे गत वर्षापासून रास्त भाव दुकानातून धान्य मोफत मिळत असल्याने बाजरी, ज्वारीला बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांकडे धान्य पडून आहे. बाजारात बाजरीला १,२०० ते १,४०० रुपये क्विंटलचा दर असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरवून कडधान्य घेवडा, मूग, चवळी तर तेलबिया सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली. पेरणीवेळी पर्जन्यमान चांगले राहिल्याने उगवण चांगली झाली. पिके जोमदार आली; पण आंतरमशागतीनंतर खते देताना युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांना वेळेत नत्र न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली.

आता बाजरी फुलोऱ्यात तर सोयाबीन, भुईमूग, शेंगाही फुलोऱ्यात आहेत. सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने घेवडा, मूग, चवळीची फूलगळ होऊन पिके सुकू लागल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी प्रथमच पीक पद्धतीमध्ये बदल करून तेलवर्गीय पिकाकडे शेतकरी वळला. कडधान्य पिके पावसाच्या पाण्यावर चांगली येतात. धोम-बलकवडी कालव्याला पाणी सोडले आहे; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने शेताच्या बांधावर पाणी जात नाही. त्यासाठी विद्युत मोटारीने पाईपलाईनद्वारे पाणी पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हाती थोडीफार पिके लागतील. नाहीतर खरीप हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

(कोट..)

शेतकऱ्याच्या धान्य, भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असताना खते, इंधन, वीज यांचे दर वाढले. आता शेतकऱ्याने खरीप हंगामातील मशागत, पेरणी, बी-बियाणे, खते यावर लाखो रुपये खर्च केला. पिके हाताला लागतेवेळी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाणार आहे.

- त्र्यबंकराव बोबडे, बिबी, फलटण

१३ आदर्की

फोटो - आदर्की परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)