शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बँकांची कोंडी : खरीप नियोजन लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:22 IST

नितीन काळेल । सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना ...

ठळक मुद्देउद्दिष्टाच्या अवघ्या १७ टक्के पीक कर्जाचे वाटप

नितीन काळेल ।सातारा : कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला असून, बळीराजालाही खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. एकीकडे बँका कर्जवाटपासाठी सज्ज असल्यातरी शेतकरी लॉकडाऊनमुळे तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे बँकांना २ हजार २७० कोटींचे टार्गेट असलेतरी आतापर्यंत फक्त ३७६ कोटी रुपये वाटप झाले आहे. हे प्रमाण अवघे १७ टक्के आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरहून अधिक आहे. यामध्ये भात, सोयाबीन, बाजरी, भुईमूग अशी महत्त्वाची पिके घेण्यात येतात. खरीप हंगामासाठी शेतकरी विविध बँका, सोसायट्यांकडून कर्ज घेतो. त्यानंतर या कर्जाची फेडही होते. दरवर्षी एप्रिलपासून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास प्रारंभ होतो. सप्टेंबर अखेरपर्यंत खरीप हंगामाचा कर्ज पुरवठा होतो. त्यासाठी विविध बँकांना उद्दिष्टही देण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या काळासाठी जिल्ह्यातील जवळपास ३५ बँकांना २ हजार २७० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

त्यापैकी ११०० कोटींचे उद्दिष्ट हे जिल्हा बँकेला आहे. आतापर्यंत सर्व बँकांनी मिळून ३७६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना केलेले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने सर्वाधिक ३५७ कोटी रुपयांचे वाटप शेतकºयांना केलंय. सरासरी पाहिली तर आतापर्यंत फक्त १७ टक्केच कर्ज वाटप झालेले आहे. तर ७४ हजार ७९८ शेतकºयांनी पीक कर्ज घेतलेले आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने बहुतांशी शेतकºयांना बँकांपर्यंत पोहोचताच येत नाही. त्यातच विविध कागदपत्रेही लागतात. अशा प्रकारामुळे खरीप हंगामासाठी कर्ज मिळविताना शेतक-यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. कोरोनाचे संकट दूर होत नाही, तोपर्यंत बळीराजाची ही परवड सुरूच राहणार आहे.

कारण, एकीकडे बँका खरीप हंगामासाठी कर्ज देण्यास सज्ज असताना बळीराजाला गावच सोडता येत नाही. त्यातच बँकांमध्येही पैसे काढणे आणि भरणे अशीच कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. कर्ज विभाग हा तात्पुरताच सुरू असतो. त्यामुळे कोरोना विषाणूचे संकट कमी झाल्यानंतरच बळीराजाची पावले बँका, सोसायट्यांकडे वळतील, अशी सद्य:स्थिती आहे.

 

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी बँकांना २२७० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७४ हजारांवर शेतकऱ्यांना ३७६ कोटींचे वाटप झालेले आहे. कोरोना स्थितीमुळे वाटपाचे प्रमाण कमी आहे. बँकांनीही मेळावे घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्जपुरवठा करून उद्दिष्टपूर्ती करावी.- महादेव शिरोळकर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक. बँक आॅफ महाराष्ट्र

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसFarmerशेतकरी