शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:22 IST

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. 

नसीर शिकलगारफलटण: खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्ग संदर्भात आणि विमानतळावरील हवाई पट्टी संधर्भात तसेच फलटण ते सांगली रस्त्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असून नवीन मुंबई ते बंगलोर हायवे मुळे फलटणहून मुंबईला तीन तासात पोहोचता येईल अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच उंडवडी कडेपठार बारामती फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन शिंदेवाडी भोर वरणघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि लोणंद ते सातारा रस्त्याच्या मजबुती करण्याच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर खा श्रीनिवास पाटील ,विधान परिषदेचे माजी सभापती आ रामराजे नाईक निंबाळकर ,आ शहाजीराव पाटील ,आ दीपक चव्हाण ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर ,समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन बेडके, जयकुमार शिंदे, जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आदी उपस्थित होते माझे गाव तसेच मी वारकरी संप्रदायाशी निगडित असून माझ्याही गावाला प्रति पंढरपूर असे म्हटले जाते ज्यावेळी आळंदीहून पंढरपूरला वारकरी पायी जात असतात त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊनच आम्ही आळंदी ते पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता वारकऱ्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

 खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या दृष्टीने फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात जी रुंदीकरणाची आणि मजबुती करण्याची मागणी केली आहे ती मागणी तातडीने पूर्ण करणार आहे असे  गडकरी यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे माझ्या खात्यामधील रस्त्यांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मागण्या खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केल्या आहे त्या शंभर टक्के पूर्ण करणार आहे मी ज्यावेळेस शब्द देतो तो शब्द पाळत असतो त्यामुळे मी दिलेला शब्द पूर्ण होणार आहे त्याची काळजी फलटणकरानी करू नये असे सांगतानाच नवीन मुंबई ते बंगळुरू या नवीन रस्त्यामुळे फलटण ते मुंबई हे अंतर तीन तासात पार करता येईल इतके चांगले काम नवीन रस्त्याचे होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर मार्गाची चौपदरीकरणाचे मागणी नितीन गडकरी यांनी पूर्ण केल्याबद्दल आभार मानून फलटण ते बारामती या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच फलटण ते दहिवडी रस्त्याचे रुंदीकरण करण्याबरोबरच नाईकबोमवाडी येथे होणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीला नवीन पालखी मार्ग जोडावा अशी मागणी केली ज्या ज्या वेळी मी माढा लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात नितीन गडकरींना भेटलो व कामे सांगितली ती कामे त्यांनी शंभर टक्के पूर्ण केली असून जवळपास एक लाख कोटी रुपयांचा निधी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी खर्च होत असल्याचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटणला जोडणारे अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जात असल्याने विकास कामाचा मोठा डोंगर या तालुक्यात उभा राहणार असून अनेक मोठे उद्योगधंदे येणार आहेत याचे सर्व श्रेय नितीन गडकरी यांनाच आहे असे सांगून खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपण राजकारणावर सध्या काही बोलणार नाही मात्र ज्यावेळी राजकीय आखाड्यात उतरू त्यावेळी मात्र राजकारणावर बोलू असे स्पष्ट केले आ रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात आज आपण साताराहून मुंबईला ज्या एक्सप्रेस हायवेमुळे चार तासात पोचतो याचे श्रेय नितीन गडकरी यांना असून पक्ष, जात पात न बघता किंवा कोणतेही राजकारण न आणता नितीन गडकरी यांनी विकासाची कामे केल्याचे गौरवोद्गार रामराजेनी काढले कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही कौतुक रामराजे यांनी करताना भांडायचे वेळेस भांडू राजकारण करू पण आत्ता ही वेळ नसल्याचे सांगितले

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकरphaltan-acफलटण