शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 20:22 IST

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले. 

नसीर शिकलगारफलटण: खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्ग संदर्भात आणि विमानतळावरील हवाई पट्टी संधर्भात तसेच फलटण ते सांगली रस्त्यांच्या संदर्भात केलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा शब्द देत असून नवीन मुंबई ते बंगलोर हायवे मुळे फलटणहून मुंबईला तीन तासात पोहोचता येईल अशी ग्वाही केंद्रीय सडक परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर नितीन गडकरी यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे तसेच उंडवडी कडेपठार बारामती फलटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन शिंदेवाडी भोर वरणघाट रस्त्याचे रुंदीकरण आणि लोणंद ते सातारा रस्त्याच्या मजबुती करण्याच्या शुभारंभ प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर खा श्रीनिवास पाटील ,विधान परिषदेचे माजी सभापती आ रामराजे नाईक निंबाळकर ,आ शहाजीराव पाटील ,आ दीपक चव्हाण ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर ,समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन बेडके, जयकुमार शिंदे, जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आदी उपस्थित होते माझे गाव तसेच मी वारकरी संप्रदायाशी निगडित असून माझ्याही गावाला प्रति पंढरपूर असे म्हटले जाते ज्यावेळी आळंदीहून पंढरपूरला वारकरी पायी जात असतात त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊनच आम्ही आळंदी ते पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण आधुनिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या तीन महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करून हा रस्ता वारकऱ्यांसाठी सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

 खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या दृष्टीने फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात जी रुंदीकरणाची आणि मजबुती करण्याची मागणी केली आहे ती मागणी तातडीने पूर्ण करणार आहे असे  गडकरी यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे माझ्या खात्यामधील रस्त्यांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मागण्या खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केल्या आहे त्या शंभर टक्के पूर्ण करणार आहे मी ज्यावेळेस शब्द देतो तो शब्द पाळत असतो त्यामुळे मी दिलेला शब्द पूर्ण होणार आहे त्याची काळजी फलटणकरानी करू नये असे सांगतानाच नवीन मुंबई ते बंगळुरू या नवीन रस्त्यामुळे फलटण ते मुंबई हे अंतर तीन तासात पार करता येईल इतके चांगले काम नवीन रस्त्याचे होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आळंदी ते पंढरपूर मार्गाची चौपदरीकरणाचे मागणी नितीन गडकरी यांनी पूर्ण केल्याबद्दल आभार मानून फलटण ते बारामती या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच फलटण ते दहिवडी रस्त्याचे रुंदीकरण करण्याबरोबरच नाईकबोमवाडी येथे होणाऱ्या नवीन औद्योगिक वसाहतीला नवीन पालखी मार्ग जोडावा अशी मागणी केली ज्या ज्या वेळी मी माढा लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामासंदर्भात नितीन गडकरींना भेटलो व कामे सांगितली ती कामे त्यांनी शंभर टक्के पूर्ण केली असून जवळपास एक लाख कोटी रुपयांचा निधी नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामासाठी खर्च होत असल्याचे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटणला जोडणारे अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जात असल्याने विकास कामाचा मोठा डोंगर या तालुक्यात उभा राहणार असून अनेक मोठे उद्योगधंदे येणार आहेत याचे सर्व श्रेय नितीन गडकरी यांनाच आहे असे सांगून खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपण राजकारणावर सध्या काही बोलणार नाही मात्र ज्यावेळी राजकीय आखाड्यात उतरू त्यावेळी मात्र राजकारणावर बोलू असे स्पष्ट केले आ रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात आज आपण साताराहून मुंबईला ज्या एक्सप्रेस हायवेमुळे चार तासात पोचतो याचे श्रेय नितीन गडकरी यांना असून पक्ष, जात पात न बघता किंवा कोणतेही राजकारण न आणता नितीन गडकरी यांनी विकासाची कामे केल्याचे गौरवोद्गार रामराजेनी काढले कार्यक्रमाचे चांगले नियोजन केल्याबद्दल खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही कौतुक रामराजे यांनी करताना भांडायचे वेळेस भांडू राजकारण करू पण आत्ता ही वेळ नसल्याचे सांगितले

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकरphaltan-acफलटण