शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे 

By नितीन काळेल | Updated: January 25, 2024 18:04 IST

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा 

सातारा : शासनाने आमच्या जमिनी काढून घेतल्या आणि तेथे कंपन्या आणल्या. आम्हाला जगायचंय, स्वच्छ पाणी आणि हवा पाहिजे. जमिनीत केमिकल नको. तुम्हाला वाटत असेल आम्ही जगायला नको, तर मरायलाही तयार आहे. यासाठी तुम्ही बघायला यावं, असे साकडे प्रशासनाला घालत केसुर्डी ग्रामस्थांनी प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतील कंपन्यावर कारवाईची मागणी केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसीतील इलजीन ग्लोबल इंडिया आणि ओरिएंटल इस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी केसुर्डी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.कंपन्यांमधून बाहेर टाकण्यात येणारी रसायनयुक्त राख व केमिकलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. मागील अनेक वर्षांपासून हजारो टन राख खड्डे काढून त्यात गाडण्यात येत आहे. तसेच रासायनिक द्रवेही याच खड्ड्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. हे घटक जमिनीत मिसळत आहेत, त्याचा अंश भूगर्भात जात आहे. या कंपन्यांतून निघालेल्या टाकाऊ रासायनिक द्रव्याची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे केसुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यातील रासायनिक घटक जमिनी व जलसाठ्यांमध्ये आढळून येत आहेत.मानवी आरोग्यासही ते घातक ठरत आहेत. या कंपन्यांकडून शासनाच्या प्रदूषणाबाबतच्या निकषांची पायमल्ली केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसुर्डी ग्रामस्थांनी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण