शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Satara: आम्हालाही जगायचंय, स्वच्छ हवा-पाणी हवं; केसुर्डी ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे 

By नितीन काळेल | Updated: January 25, 2024 18:04 IST

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी अर्धनग्न मोर्चा 

सातारा : शासनाने आमच्या जमिनी काढून घेतल्या आणि तेथे कंपन्या आणल्या. आम्हाला जगायचंय, स्वच्छ पाणी आणि हवा पाहिजे. जमिनीत केमिकल नको. तुम्हाला वाटत असेल आम्ही जगायला नको, तर मरायलाही तयार आहे. यासाठी तुम्ही बघायला यावं, असे साकडे प्रशासनाला घालत केसुर्डी ग्रामस्थांनी प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतील कंपन्यावर कारवाईची मागणी केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.खंडाळा तालुक्यातील केसुर्डी एमआयडीसीतील इलजीन ग्लोबल इंडिया आणि ओरिएंटल इस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी केसुर्डी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.कंपन्यांमधून बाहेर टाकण्यात येणारी रसायनयुक्त राख व केमिकलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. मागील अनेक वर्षांपासून हजारो टन राख खड्डे काढून त्यात गाडण्यात येत आहे. तसेच रासायनिक द्रवेही याच खड्ड्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. हे घटक जमिनीत मिसळत आहेत, त्याचा अंश भूगर्भात जात आहे. या कंपन्यांतून निघालेल्या टाकाऊ रासायनिक द्रव्याची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे केसुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यातील रासायनिक घटक जमिनी व जलसाठ्यांमध्ये आढळून येत आहेत.मानवी आरोग्यासही ते घातक ठरत आहेत. या कंपन्यांकडून शासनाच्या प्रदूषणाबाबतच्या निकषांची पायमल्ली केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केसुर्डी ग्रामस्थांनी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण