शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

काश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 14:22 IST

कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी केले.

ठळक मुद्देकाश्मिरला पॅकेजची गरज नसून विश्वासाच्या मायेची फुंकर हवी : नलावडे साताऱ्यातील स्मृती व्याख्यानमालेत वक्तव्य

सातारा: कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी केले.इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालयाच्या अ‍ॅड. व्ही. एन. पाटील स्मृती व्याख्यानमालेचे तिसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता पवार, क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉ किरण माने, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील, अ‍ॅड प्रवीण देशपांडे, आनंद ओक उपस्थित होते.

'कॉ नलावडे म्हणाले, काश्मीर हे राज्य भारताचेच आहे. त्यामुळे सर्वांनी मनातील गोंधळ दूर करा. काश्मीर राज्यात शांततापूर्ण परिस्थिती आहे. केवळ श्वास घेण्याइतपत स्वातंत्र्य आहे. पुढील योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील केंद्र सरकारकडे आहे.

४ आॅगस्टला केंद्राकडून ज्या पद्धतीने राजकीय पध्दतीने हालचाली सुरू होत्या. त्यानुसार राज्यात काहीतरी मोठ्या हालचाली घडणार हे अपेक्षित होते. भारतीय जीवन पध्दतीच्या मूळ प्रवाहाशी काश्मिरी लोकांचे मनोमिलन घडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. मात्र कायदा आणि मनोमिलन या दोन स्वतंत्र व दोन धृवावरच्या गोष्टी आहेत.कॉम्रेड वसंतराव नलावडे पुढे म्हणाले, गेल्या एकोणतीस वर्षात काश्मीरमधून बेचाळीस हजार काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले. त्यामुळे १९५२ च्या दिल्ली करारातील जनमताचा मुद्दा आता कालबाह्य ठरला आहे. प्रत्येक वेळी ३७० च्या आडोशाने राजकीय अगतिकतेचा संभ्रम वारंवार तयार करण्यात आल्याने काश्मिरी जनता अतिरेकी व राज्यकर्ते यांना वैतागली आहे.

काश्मिरी लोकांना पॅकेजची गरज नाही तर त्यांना रोजगार, शिक्षण, सुरक्षितता यांचा विश्वास देण्याची गरज आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था सफरचंदाच्या बागावर अवलंबून आहे. येथे तीन महिने हंगाम असतो त्या हंगामातील रोजगाराला संधी मिळाली नाही तर प्रचंड उद्रेक होण्याची भीती नलावडे यांनी व्यक्त केली.काश्मीर प्रश्न हा भारताचा अंर्तगत प्रश्न आहे, हे विकसित देशांनी मान्य केले आहे. मात्र जागतिक पातळीवर अति भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाल्याने ही मान्यता किती काळ टिकेल, याची शाश्वती नाही. लोकशाहीचा नागरिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक झाला आहे. त्यामुळे सामान्यांचा आवाज येथे ऐकला जाणार नाही. ती परिस्थिती काश्मीरमध्ये येऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नलावडे यांनी सांगितले.अ‍ॅड प्रवीण देशपांडे, व आनंद ओक यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्राचार्य सुजाता पवार यांनी प्रास्तविक केलेपोलिसांकडून नोटीस..भारतीय राज्यघटना व ३७० कलम या विषयावर अ‍ॅड. वसंतराव नलावडे यांच्या व्याख्यानाला भाजपच्या कार्यकत्यार्नी आक्षेप घेतला होता. कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून इस्माइल मुल्ला लॉ कॉलेजच्या महाविद्यालयात शहर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

शहर पोलिसांनी नलावडे यांना १४९ ची नोटीस बजावली होती. महाविद्यालय व्यवस्थापनानेही परिस्थिती संयमाने हाताळली. भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, अमीत कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही व्याख्यानाला उपस्थिती दर्शविली. कोणताही अनुचित प्रकार न घडता व्याख्यान पार पडले.

टॅग्स :Article 370कलम 370Satara areaसातारा परिसरcollegeमहाविद्यालय