शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

'गुरुजीं'चीच झाली परीक्षा!, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात 'या' खासगी संस्थेने राबवला पहिलाच प्रयोग

By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 13:47 IST

सुमारे १७५ जणांनी दिला पेपर

प्रमोद सुकरे कऱ्हाड : नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची काटेकोर अंमलबजावणी राज्यात टप्प्या-टप्प्याने सुरू झालेली आहे. नवीन शिक्षण धोरणाचे हे आव्हान पेलण्यासाठी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने गेल्या वर्षभरात शिक्षकांसाठी अनेक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून नुकतीच शिक्षण मंडळाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांची नुकतीच परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेला संस्थेतील १७५ शिक्षक या सामोरे गेले. संस्थेच्या या उपक्रमाचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण, बहुभाषिकता, कौशल्य विकसन, व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव, परिवर्तित शिक्षणाचा आकृतीबंध आदी वैशिष्ट्ये असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची काटेकोर अंमलबजावणी राज्यात टप्प्या-टप्प्याने सुरू झालेली आहे. हे धोरण  शाश्वत विकासाच्या ध्येयांशी जोडले गेलेले आहे.त्यामुळेच या नवीन शिक्षण धोरणाचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक सक्षम झाले पाहिजेत म्हणून शिक्षण मंडळाच्यावतीने या परिक्षेचे नियोजन करण्यात आले.नवीन शिक्षण धोरणाची योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी, शिक्षकांची मानसिकता जाणण्याच्या दृष्टीने संस्थेने राबविलेल्या “ गुरुजींची परीक्षा ” या उपक्रमास शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच. शिवाय अशा परीक्षांची उपयुक्तताही बोलून दाखविली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्रशासकीय  अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ही जिल्ह्यातील एकमेव संस्था असावी सातारा जिल्ह्यामध्ये अनेक खासगी शिक्षण संस्था कार्यरत आहेत. पण नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था स्तरावर व्याख्याने, प्रशिक्षणे घेणारी व शिक्षकांनी त्यातून काय घेतले हे जाणून घेणा्यासाठी शिक्षकांची परिक्षा घेणारी जिल्ह्यातील कराड शिक्षण मंडळ ही एकमेव संस्था असावी. यातून इतर शिक्षण संस्थानी बोध घेतला तर नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवणे सुलभ होईल.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन स्तरावर तर प्रयत्न सुरू आहेतच. पण आम्ही आमच्या संस्था स्तरावर देखील शिक्षकांची प्रशिक्षणे घेतली. तज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणले. या सगळ्या मधून आमच्या शिक्षकांनी नेमके किती आणि काय आत्मसात केले? हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांची ही परीक्षा घेतली.त्याला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. - अनघा परांडकर, उपाध्यक्षा, शिक्षण मंडळ कराड