शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद-आदर्की फाटा मार्गावरील प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:37 IST

वाठार स्टेशन : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेल्या ...

वाठार स्टेशन : लोणंद ते आदर्की फाटा मार्गाच्या कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे प्रवाशांसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्याचे काम आता लवकरच मार्गी लागणार असल्याने महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. यामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातून जाणाऱ्या लोणंद ते सातारा महामार्गाची दुरूस्ती व्हावी व मार्ग वाहतुकीयोग्य करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुण्याचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आदर्की फाटा ते वाढे फाटामध्ये रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

याच मार्गावरील आदर्की फाटा ते लोणंदपर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता अशी ओळख असलेल्या या मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

खराब रस्त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे लोणंद परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. खासदार श्रीनिवास पाटील यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन तशी सूचना केली होती. त्याचबरोबर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहून या कामासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनुसार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून लोणंद ते आदर्की फाटा रस्ता मजबुतीकरण कामासाठी १२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

त्यानुसार निविदा प्रक्रिया तातडीने हाती घेण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत आहे. या कामासाठी निधी मंजूर झाल्याने खराब झालेल्या महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने दळणवळण सोयीचे होणार आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\