शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

भक्तिगीतातून संतपरंपरेचा सुरेल प्रवास..

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

वेण्णाई भक्तिमंचचा कार्यक्रम : ज्योत्स्नाभाभींना भावपूर्ण श्रद्धांजली

सातारा : महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात. संत परंपरा काय आहे. संतांनी काय आदर्श घालून दिले, याचे यथार्थ दर्शन सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी घडविले. भक्तिगीत, भावगीतांतून त्यांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास समोर आणला. सुमारे तीन तास सुरू असणारा हा कार्यक्रम सातारच्या महिलांना भावून गेला. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या ज्योत्स्नाभाभी दर्डा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा येथील शाहू कला मंदिरमध्ये ‘आठवण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर माने, सिद्धी पवार, जयश्री शिंदे, स्वाती ओक यांच्या उपस्थितीत झाले. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांची प्राणज्योत दोन वर्षांपूर्वी २३ मार्चला मालवली. त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सखी मंचने ‘आठवण’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ ही वंदना झाली. त्यानंतर सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास घडविला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला संस्कार दिले आहेत. महाराष्ट्रात विविध सांप्रदाय असले तरी वारकरी सांप्रदाय हा महत्त्वपूर्ण आहे. दरवर्षी लाखो भाविक आळंदी-पंढरपूरची वारी करतात. तसेच दर महिन्यालाही पंढरीच्या ओढीने जाणारे हजारो भाविक आहेत, असे सांगून त्यांनी ‘खेळ मांडियेला वाळवंटी दाटी, नाचती वैष्णव भाईरे...’ हे भक्तिगीत सादर केले. त्यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ हे भक्तिगीत सादर केले.‘शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान,’ हे भक्तिगीत सादर झाले. त्यानंतर ‘संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत’, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,’ ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे पुण्याची गणना कोण करी,’ दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,’ ‘काटा रुते कुणाला,’ ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा,’ तसेच ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ यासारखी भावगीतेही या कार्यक्रमात सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन सचिन सावंत यांनी केले. किरण भोसले, किशोर माने, किरण सावंत, संजय वर्णेकर यांनी गायन केले. हार्मोनियम किरण भोसले, सिंथेसायझर सोमनाथ गोरे, तबला हरी चव्हाण, ढोलकी वादन तुषार पवार, तालवाद्य अशोक पवार यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सखींनी भाभीजींच्या प्रतिमेला फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)सखी मंचला १३ वर्षे पूर्ण...ज्योत्स्नाभाभींच्या संकल्पनेतून साकारलेले ‘सखी मंच’ हे महिलांचे हक्काचं व्यासपीठ, आज त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचे असणारे ‘सखी मंच’ ज्योत्स्नाभाभींच्या अथक परिश्रमांचे, चिकाटीचे फळ आहे. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या अंकुराचे आज महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सखी मंचने आपल्या यशस्वी कारकिर्दीची तेरा वर्षे पूर्ण केली आहेत.