शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

जयंत पाटील, तुम्ही लवकरच सभागृहात असाल; पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 15:18 IST

मी खोकी कोठून आणू : जयंत पाटील

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव आम्हा सर्वांच्या जिव्हारी लागला आहे; पण जयंतराव तुम्हाला लवकरच सभागृहात आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला प्रतिसाद दिला.कऱ्हाड येथे माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व विलासराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून चव्हाण बोलत होते.यावेळी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार संग्राम थोपटे, श्रीमंत पाटील, काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून चालत नाही, तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मी मुख्यमंत्री असताना राज्य बँकेबाबत धाडसी निर्णय घेतला. म्हणूनच ती बँक आज वाचली आहे.मी खोकी कोठून आणू : जयंत पाटीलजयंत पाटील म्हणाले, खरंतर आजचा हा कार्यक्रम ठरवताना ॲड. उदयसिंह पाटील यांनी पहिल्यांदा माझी वेळ घेतली होती. मी त्यांना येण्याचा शब्द दिला होता. म्हणून तर परवा निवडणुकीत हरलो तरी आज इथे आलो आहे. पण, अलीकडे शब्द पाळणारी लोकं कमी राहिली आहेत. सगळी माणसं खोक्याची होत आहेत. मी खोकी कोठून आणू? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण