शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापले रान, पण प्रकल्पग्रस्तांचेही ठेवा भान; सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा सवाल 

By दीपक देशमुख | Updated: April 24, 2024 11:43 IST

नेत्यांच्या गाड्यांचे ताफे आमच्या वाड्या-वस्त्यांवरही येऊ द्या

दीपक देशमुखसातारा : सातारा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि समर्थकांनी प्रचाराची राळ उडवली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. परंतु, प्रचाराच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील २५ प्रकल्पांतील सुमारे २२ हजार प्रकल्पग्रस्तांच्याही समस्यांबाबत कुणी बोलणार आहे काय, असा सवाल या प्रकल्पग्रस्तांतून होत आहे.

सातारा लोकसभेतून दुरंगी लढत निश्चित होताच घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनी मुंबई बाजार समितीचा बाजार सातारा लोकसभेच्या आखाड्यात भरवला गेला आहे. यामुळे सातारा लोकसभेच्या लढतीकडे साताऱ्यासह ठाण्या-मुंबईकरांचेही लक्ष वेधून घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील विकासाचे अनेक मुद्दे असताना, उमेदवार व त्यांच्यासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करताना लायकी काढण्यापर्यंत प्रचाराची पातळी खालावली आहे.सातारा जिल्ह्यात सहा मोठे आणि दहा मध्यम प्रकल्प, तसेच लघू प्रकल्प मिळून २६ प्रकल्प आहेत. यात सुमारे २२ हजार प्रकल्पग्रस्त आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही अनेकांची घरे, जमिनी गेल्या आहेत. हे प्रकल्प उभारताना भूमिपुत्रांनी आपली घरेदारे, शेती, गावगाडा, गावकी-भावकी या सर्वावर पाणी सोडले आहे. परंतु, धरणाला जमीन देणारे हे भूमिपुत्र अजूनही उपाशीच आहेत. अनेकांचे पुनर्वसन अजून झालेले नाही, तर ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्याठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्वसित झालेल्या राहणाऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी शासन दरबारी अनेक आंदोलने केलेली आहेत. त्यांचा शासन दरबारी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. जिल्ह्यातील पुनर्वसित गावांच्याही व्यथा नेतेमंडळींनी जाणून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पमोठे : कोयना, वीर, धाेम, कण्हेर, उरमोडी, तारळीमध्यम : आंधळी, महू-हातगेघर, येरळवाडी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी, आसरे रेणावहे बोगदालघू : उत्तरमांड, मोरणा गुरेघर, महिंद, नागेवाडी, निवकणे, आंबळे, येवती-म्हासोली, टेंभू उपसा, चिटेघर, बिबी, काळगाव, कुसवडे.

सातारा जिल्हा हा प्रकल्पग्रस्तांचा, धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांचा आहे. पुनर्वसनाबाबत कोणीही जाहीरनामा प्रकाशित करत नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. निवडणुका तोंडावर आल्या की, प्रकल्पग्रस्तांची आठवण होते व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू म्हणतात, पण निवडणुका झाल्या की, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता तरी प्रमाणिकपणे प्रयत्न करणार का व प्रश्न नेतेमंडळी जाणून घेणार का? - चैतन्य दळवी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४