शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी तापले रान, पण प्रकल्पग्रस्तांचेही ठेवा भान; सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा सवाल 

By दीपक देशमुख | Updated: April 24, 2024 11:43 IST

नेत्यांच्या गाड्यांचे ताफे आमच्या वाड्या-वस्त्यांवरही येऊ द्या

दीपक देशमुखसातारा : सातारा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि समर्थकांनी प्रचाराची राळ उडवली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. परंतु, प्रचाराच्या रणधुमाळीत जिल्ह्यातील २५ प्रकल्पांतील सुमारे २२ हजार प्रकल्पग्रस्तांच्याही समस्यांबाबत कुणी बोलणार आहे काय, असा सवाल या प्रकल्पग्रस्तांतून होत आहे.

सातारा लोकसभेतून दुरंगी लढत निश्चित होताच घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनी मुंबई बाजार समितीचा बाजार सातारा लोकसभेच्या आखाड्यात भरवला गेला आहे. यामुळे सातारा लोकसभेच्या लढतीकडे साताऱ्यासह ठाण्या-मुंबईकरांचेही लक्ष वेधून घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील विकासाचे अनेक मुद्दे असताना, उमेदवार व त्यांच्यासाठी सहकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करताना लायकी काढण्यापर्यंत प्रचाराची पातळी खालावली आहे.सातारा जिल्ह्यात सहा मोठे आणि दहा मध्यम प्रकल्प, तसेच लघू प्रकल्प मिळून २६ प्रकल्प आहेत. यात सुमारे २२ हजार प्रकल्पग्रस्त आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही अनेकांची घरे, जमिनी गेल्या आहेत. हे प्रकल्प उभारताना भूमिपुत्रांनी आपली घरेदारे, शेती, गावगाडा, गावकी-भावकी या सर्वावर पाणी सोडले आहे. परंतु, धरणाला जमीन देणारे हे भूमिपुत्र अजूनही उपाशीच आहेत. अनेकांचे पुनर्वसन अजून झालेले नाही, तर ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्याठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्वसित झालेल्या राहणाऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी शासन दरबारी अनेक आंदोलने केलेली आहेत. त्यांचा शासन दरबारी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. जिल्ह्यातील पुनर्वसित गावांच्याही व्यथा नेतेमंडळींनी जाणून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पमोठे : कोयना, वीर, धाेम, कण्हेर, उरमोडी, तारळीमध्यम : आंधळी, महू-हातगेघर, येरळवाडी, नीरा-देवघर, वांग-मराठवाडी, आसरे रेणावहे बोगदालघू : उत्तरमांड, मोरणा गुरेघर, महिंद, नागेवाडी, निवकणे, आंबळे, येवती-म्हासोली, टेंभू उपसा, चिटेघर, बिबी, काळगाव, कुसवडे.

सातारा जिल्हा हा प्रकल्पग्रस्तांचा, धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांचा आहे. पुनर्वसनाबाबत कोणीही जाहीरनामा प्रकाशित करत नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. निवडणुका तोंडावर आल्या की, प्रकल्पग्रस्तांची आठवण होते व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू म्हणतात, पण निवडणुका झाल्या की, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता तरी प्रमाणिकपणे प्रयत्न करणार का व प्रश्न नेतेमंडळी जाणून घेणार का? - चैतन्य दळवी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४