शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देवाच्या वाटेवर मिळतय अपघाताला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 14:12 IST

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

ठळक मुद्देखालकरवाडी-चाफळ रस्ता अपघाताला आमंत्रण खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकालोकप्रतिनिधीचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा

चाफळ ,दि. १ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

चाफळ येथील पर्यटन तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा मिळालेले श्रीराम मंदिर, शिंगणवाडी येथील समर्थ स्थापित खडीचा मारुती मंदिरासह निसर्ग सौंदर्याने नटलेला सडावाघापूरचा निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची या रस्त्यावरून वर्दळ असते.

खालकरवाडी ते चाफळ हा साधारणत: पाच किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणि खड्डे पडले आहेत. खड्ड्यात अडकून अनेकदा अनेकांना दुखापतीही झाल्या आहेत. तर माजगाव येथील बाळकृष्ण हिमणे या तरुणाचा याच रस्त्यावर अपघात होऊन बळी गेला आहे. मात्र, तरीही बांधकाम विभाग कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही.

सध्या या रस्त्यावरून चारचाकी वाहने चालविणेही मुश्कील झाले आहे. यातच सध्या चाफळ व परिसरातील तीर्थक्षेत्रे व निसर्गरम्य परिसराला भेट देणाऱ्या पर्यटक भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परंतु रस्त्याची दुरवस्था पाहून काही पर्यटक देवदर्शनास येणे टाळू लागले आहेत.

तालुक्यासह जिल्ह्यातील इतर देवस्थान, तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते व त्या ठिकाणांच्या विकासाचा विचार केल्यास निश्चितच विभागासह तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे वास्तव आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा अंकुश राहिला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याकडेला वाढलेली झाडे याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्यासाठी भरघोस निधी उपल्बध करून हा रस्ता चौपदरी करण्यासाठी प्रयत्न करावेत, मागणी होत आहे.श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जाचाफळ येथील श्रीराम मंदिरास तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर साधारण दोनवेळा येथील विकास कामासाठी निधी देऊ केला होता. त्यानंतर शासनाच्या पर्यटन खात्यामार्फत या ठिकाणच्या विकासासाठी निधीच दिला नाही.

वास्तविक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या कोणाही लोकप्रतिनिधीस साधा या तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या रस्त्यास साधा निधी मिळविता आला नाही, ही येथील शोकांतिका आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा