शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते ...

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे, तर सातारा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे.

सातारा बाजार समितीत शुक्रवारी १३९४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १९६, बटाटा १०१, लसूण १२ आणि आल्याची ३ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली.

सोयाबीन तेल दरात वाढ...

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी दर स्थिर राहिले. मात्र, मागील आठवड्यात डब्यामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेंगदाणा तेल डबा २६०० ते २७००, सोयाबीन डबा २३०० ते २३५० आणि पामतेलचा १९०० ते २ हजारापर्यंत मिळत आहे.

कलिंगडाची आवक...

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. तसेच द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे. कलिंगडाचा दर कमी झाला आहे.

मिरचीला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ६० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ५ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी करतो. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवू लागले आहेत.

- राजाराम खरात, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुन्हा एकदा खाद्यतेलात वाढ झाली आहे. डब्यामागे ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. त्यातच आता कडक लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घातलेले पैसे निघाले तरी आनंद आहे.

- रामा काळे, शेतकरी