शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते ...

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे, तर सातारा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे.

सातारा बाजार समितीत शुक्रवारी १३९४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १९६, बटाटा १०१, लसूण १२ आणि आल्याची ३ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली.

सोयाबीन तेल दरात वाढ...

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी दर स्थिर राहिले. मात्र, मागील आठवड्यात डब्यामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेंगदाणा तेल डबा २६०० ते २७००, सोयाबीन डबा २३०० ते २३५० आणि पामतेलचा १९०० ते २ हजारापर्यंत मिळत आहे.

कलिंगडाची आवक...

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. तसेच द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे. कलिंगडाचा दर कमी झाला आहे.

मिरचीला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ६० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ५ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी करतो. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवू लागले आहेत.

- राजाराम खरात, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुन्हा एकदा खाद्यतेलात वाढ झाली आहे. डब्यामागे ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. त्यातच आता कडक लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घातलेले पैसे निघाले तरी आनंद आहे.

- रामा काळे, शेतकरी