शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते ...

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे, तर सातारा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे.

सातारा बाजार समितीत शुक्रवारी १३९४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १९६, बटाटा १०१, लसूण १२ आणि आल्याची ३ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली.

सोयाबीन तेल दरात वाढ...

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी दर स्थिर राहिले. मात्र, मागील आठवड्यात डब्यामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेंगदाणा तेल डबा २६०० ते २७००, सोयाबीन डबा २३०० ते २३५० आणि पामतेलचा १९०० ते २ हजारापर्यंत मिळत आहे.

कलिंगडाची आवक...

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. तसेच द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे. कलिंगडाचा दर कमी झाला आहे.

मिरचीला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ६० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ५ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी करतो. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवू लागले आहेत.

- राजाराम खरात, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुन्हा एकदा खाद्यतेलात वाढ झाली आहे. डब्यामागे ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. त्यातच आता कडक लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घातलेले पैसे निघाले तरी आनंद आहे.

- रामा काळे, शेतकरी