शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

खाद्यतेलामुळे महागाईला फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:36 IST

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते ...

सातारा : मागील पाच महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहे. या आठवड्यात तर १५ किलोच्या डब्यामागे सरासरी ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे, तर सातारा बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर असून, वाटाणा ८ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे.

सातारा बाजार समितीत शुक्रवारी १३९४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १९६, बटाटा १०१, लसूण १२ आणि आल्याची ३ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली.

सोयाबीन तेल दरात वाढ...

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी दर स्थिर राहिले. मात्र, मागील आठवड्यात डब्यामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शेंगदाणा तेल डबा २६०० ते २७००, सोयाबीन डबा २३०० ते २३५० आणि पामतेलचा १९०० ते २ हजारापर्यंत मिळत आहे.

कलिंगडाची आवक...

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. तसेच द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे. कलिंगडाचा दर कमी झाला आहे.

मिरचीला दर

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ६० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका ३०० ते ३५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ५ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी करतो. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवू लागले आहेत.

- राजाराम खरात, ग्राहक

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिले. पुन्हा एकदा खाद्यतेलात वाढ झाली आहे. डब्यामागे ५० ते १०० रुपये वाढ झाली आहे.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. त्यातच आता कडक लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे घातलेले पैसे निघाले तरी आनंद आहे.

- रामा काळे, शेतकरी