शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

वाढत्या प्रदुषणामुळे नैसर्गिक तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST

म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा ...

म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा फैलाव वाढून व भविष्यात येऊ घातलेल्या महामारीपासून प्रत्येकाच्या आरोग्याला धोका संभवत आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी दुष्काळी भागातील माण-खटावमधील शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानातून बांबूची लागवड करावी,’ असे आवाहन भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

म्हसवड येथे चेतना सिन्हा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, संजीव करपे, पार्थ सिन्हा उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी बांबू पिकाची लागवड केल्यास एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. माण तालुका दुष्काळी आहे, या तालुक्यात ऊन्हाची तीव्रता अधिक असते. कमी पाऊस पडतो, त्यामुळे या दुष्काळी भागाला हमखास वरदान ठरणारे असे बांबू पीक आहे. वातावरणातील प्रदूषणात दिवसेंदिवस होत चाललेली वाढ चिंताजनक आहे. या भागातील हवेतील तापमान व प्रदूषणाची पातळी कमी करुन वातावरणाचा समतोल राखण्यासाठी या भागात मोठे असलेले जिराईत व पडीक क्षेत्रात पाणी उपलब्ध असो वा नसो बांबूची यशस्वीपणे लागवड करणेच योग्य असून, शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. बांबूपासून किमती फर्निचर, टूथब्रश, कपडे, इथेलॉन, वाहनाला लागणारे किट अशा सुमारे एक हजार आठशे विविध वस्तू तयार करण्याचे प्रकल्प सुरु केलेले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून प्रतिरोप लागवडीला १२० रुपये व अटल बांबू योजनेंतर्गत एका रोपाच्या लागवडीसाठी २७ रूपये याप्रमाणे हेक्टरी पाच लाखांचे अनुदान दिले जात आहे. ‘मनरेगा’मधूनही बांबू लागवड करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे.