शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासकीय आशीर्वाद; ४८ लाखांचा निधी उपलब्ध 

By नितीन काळेल | Updated: April 3, 2024 19:34 IST

सातारा : समाजातील जाती-भेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. मात्र, ...

सातारा : समाजातील जाती-भेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेत मिळत नसल्याने लाभ लवकर मिळत नाही. पण, नुकताच ४८ लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून ९६ प्रेमींना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माहिती अशी की, समाजात अनेक चालीरीती आहेत. तसेच विविध जाती आहेत. समाजातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येतात. यासाठी शासनाचेही आर्थिक बळ मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये दोघांचाही हिस्सा प्रत्येकी ५० टक्के असतो.

जिल्हास्तरावरून ही मदत करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. त्यानंतर दाम्पत्यांना अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना सतत विचारणा करावी लागते. तसेच हेलपाटे मारण्याची वेळ येते. तर सातारा जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी लाभासाठी अर्ज केले होते. त्यातील ९६ दाम्पत्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ४८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. याबाबत लवकरच विविध प्रक्रिया पार पाडून जून महिन्यापर्यंत संबंधितांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ यांना मिळतो..आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहनपर अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, जमाती या संवर्गातील एक आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती यांनी विवाह केल्यास ते योजनेस पात्र ठरतात. तर २००४ पासून मागासवर्गीय अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या आंतरप्रवर्गातील विवाहितांनाही याचा लाभ मिळत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmarriageलग्नGovernmentसरकार