शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

प्रोत्साहनपर लाभार्थ्यांच्या खात्यात कमी रक्कम जमा शेतकरी कर्जमाफी योजना : स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:03 AM

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी

सातारा : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत असताना काही प्रोत्साहनपर लाभार्थ्यांना कमी पैसे मिळू लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याना याचा फटका बसणार असून, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य शासनाने जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ४० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. तर राज्य शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम टाकू, असा केलेला दावा पूर्णपणे फसला.तसेच दिवाळीनंतरही काही मोजक्याच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले. विरोधकांच्या राजकीय हल्ल्यापासून बचावासाठी नागपूर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया गतिमान केली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होऊ लागली. ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी २३३ कोटी ६३ लाख सहा हजार ९२८ रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तसेच नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असलीतरी काहींना कमी रक्कम मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रोत्साहनपर लाभाचे काही टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये १५ हजारांपेक्षा कमी कर्ज असणाºयांना कर्जाऐवढी रक्कम मिळणार आहे. तर १५ ते ६० हजार रुपयांच्या दरम्यान कर्जधारकांना १५ हजार आणि ६० हजारांपासून एक लाखापर्यंत कर्ज असणाºयांना कर्जाच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे. तसेच एक लाखाच्या पुढे कर्ज असणाºयांना २५ हजार रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत. सध्या शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा होत आहे; पण काहींच्या नावावर कमी रक्कम जमा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.