शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या, कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:59 IST

मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देराज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाममायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

मायणी : मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.शैक्षणिक, पर्यटन, धार्मिक व खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या या गावात परिसरातील चितळी, कलेढोण, पाचवड, पडळ, धोंडेवाडी, निमसोड व सांगली जिल्ह्यातील माहुली व भिकवडी गावातील व परिसरातील वाड्या वस्त्यातील हजारो ग्रामस्थ रोज व्यापारासाठी व शासकीय कामासाठी येत असतात.

प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल व व्यावसायिक शिक्षणासाठी याच भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. संपूर्ण गावामध्ये दिवसभर वर्दळ असते. मुख्य बाजारपेठेतून व गावातून जाणारा मल्हारपेठ-पंढरपूर हा एकमेव मार्ग असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची तसेच ग्रामस्थांची वाहने व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही याच मार्गावर लावलेली असतात.चारचाकी व दोनचाकी वाहनांसाठी कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे काही वाहनचालक राज्यमार्गाच्याकडेला किंवा बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करून खरेदीसाठी व बँक, शासकीय कामांसाठी जात असतात.

बेशिस्त पार्किंग करून गेलेल्या वाहनचालकांमुळे राज्यमार्गावर सतत वाहतुकीची कोंडी तासन्तास होत असते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकावर न येता चांदणी चौकातूनच विटा, सांगली, वडूज, दहिवडी, बारामतीकडे जातात. विटा आगाराने आठवडा बाजारदिवशी एसटी बसस्थानकावर येणार नाही, असे पत्रच संबंधितांना दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी