शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST

‘लोकमत’चे कौतुक : काविळ झालेल्या रुग्णांची चौकशी

बावधन : बावधन, ता. वाई येथे काविळीच्या आजाराची तीनशे जणांना लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने गावास भेट दिली. बावधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना केली.बावधन गावची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. या गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील जलशुद्धीकरण करणारा प्रकल्प बंद असल्यामुळे लोकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोक काविळीने आजारी पडत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये ग्रामस्थ काविळीने आजारी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी बावधनला भेट दिली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी दीपा बापट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर.बी. साठे यांना तत्काळ दोन हजार लिटरचे पाणी शुद्धीकरण व टीसीएल पावडरचे मिश्रण करणारी सिमेंटची टाकी बांधावी. यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला ती जोडून त्याद्वारे संपूर्ण गावास पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. २००७-०८ पासून नागेवाडी धरणातून गावाच्या मुख्य टाकीत सायफन पद्धतीने पाणी टाकले जात आहे. पण, टाक्यांची स्वच्छता व टीसीएल पावडरचा वापरच होत नव्हता. त्यामुळे काविळीचा आजार झाला, असल्याचे सांगण्यात येत आहे. बावधनमधील रुग्णांवरती शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत.दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा तत्परतेने कामाला लागली. यामुळे ‘लोकमत’चे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)कवठे येथेही काविळीचे वीसहून अधिक रुग्णकवठे : बावधनपाठोपाठ वाई तालुक्यातील कवठे येथेही काविळीचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या वीसपेक्षा जास्त रुग्ण काविळीच्या आजाराशी सामना करीत आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण वाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दररोज शेतमाल घेऊन जाणारे तरुण शेतकरी आहेत. दररोज शेतामधून माळवे काढायचे व दुचाकीवरून किंवा तरकारी वाहतूक करणा-या वाहनातून वाई बाजार समितीत पोहोचायचे. तेथे पाणी प्यायचे, चहा-नाष्टा करायचा आणि पुन्हा आपापल्या गावी माघारी यायचं. हा वाई तालुक्यातील विविध गावांच्या शेतकरी वर्गाचा नित्यक्रम. अशामुळेच सुमारे वीस जणांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी विश्वासाने सरपंचपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. बाधवन गावाच्या विकासासाठीच माझी कारकिर्द असेल. गावात काविळचे रुग्ण आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्य प्रयत्न करीत आहोत. आम्ही नक्कीच या संकटावर मात करण्यात यशस्वी होऊ.- नारायण पिसाळ, सरपंच