शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST

‘लोकमत’चे कौतुक : काविळ झालेल्या रुग्णांची चौकशी

बावधन : बावधन, ता. वाई येथे काविळीच्या आजाराची तीनशे जणांना लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने गावास भेट दिली. बावधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना केली.बावधन गावची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. या गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील जलशुद्धीकरण करणारा प्रकल्प बंद असल्यामुळे लोकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोक काविळीने आजारी पडत आहेत. याबाबत ‘लोकमत’मध्ये ग्रामस्थ काविळीने आजारी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी बावधनला भेट दिली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी दीपा बापट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर.बी. साठे यांना तत्काळ दोन हजार लिटरचे पाणी शुद्धीकरण व टीसीएल पावडरचे मिश्रण करणारी सिमेंटची टाकी बांधावी. यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला ती जोडून त्याद्वारे संपूर्ण गावास पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. २००७-०८ पासून नागेवाडी धरणातून गावाच्या मुख्य टाकीत सायफन पद्धतीने पाणी टाकले जात आहे. पण, टाक्यांची स्वच्छता व टीसीएल पावडरचा वापरच होत नव्हता. त्यामुळे काविळीचा आजार झाला, असल्याचे सांगण्यात येत आहे. बावधनमधील रुग्णांवरती शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत.दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा तत्परतेने कामाला लागली. यामुळे ‘लोकमत’चे सर्वत्र कौतुक होत आहे. (वार्ताहर)कवठे येथेही काविळीचे वीसहून अधिक रुग्णकवठे : बावधनपाठोपाठ वाई तालुक्यातील कवठे येथेही काविळीचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या वीसपेक्षा जास्त रुग्ण काविळीच्या आजाराशी सामना करीत आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण वाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दररोज शेतमाल घेऊन जाणारे तरुण शेतकरी आहेत. दररोज शेतामधून माळवे काढायचे व दुचाकीवरून किंवा तरकारी वाहतूक करणा-या वाहनातून वाई बाजार समितीत पोहोचायचे. तेथे पाणी प्यायचे, चहा-नाष्टा करायचा आणि पुन्हा आपापल्या गावी माघारी यायचं. हा वाई तालुक्यातील विविध गावांच्या शेतकरी वर्गाचा नित्यक्रम. अशामुळेच सुमारे वीस जणांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी विश्वासाने सरपंचपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. बाधवन गावाच्या विकासासाठीच माझी कारकिर्द असेल. गावात काविळचे रुग्ण आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्य प्रयत्न करीत आहोत. आम्ही नक्कीच या संकटावर मात करण्यात यशस्वी होऊ.- नारायण पिसाळ, सरपंच