शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

स्वच्छतेचा अभिप्राय नोंदविल्यास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज, महाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:11 IST

 स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत  स्वच्छता अ‍ॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे. याअंतर्गत संबंधित तक्रारदाराला प्रथम अ‍ॅपद्वारे स्वच्छतेविषयक तक्रार करावी लागणार आहे. पालिकेकडून या तक्रारीचे तातडीने निरसन केले जाईल.

ठळक मुद्देमहाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रमस्वच्छता अभियानास व्यापक रूप देण्यासाठी स्वच्छता अ‍ॅप विकसित... अन्यथा पालिका दंडात्मक कारवाई करेल

महाबळेश्वर :  स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत  स्वच्छता अ‍ॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे.याबाबत माहिती देताना नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वच्छता अ‍ॅप विकसित केले आहे. स्वच्छतेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रथम हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेविषयक तक्रारी नागरिकांना मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार आहे.

या स्वच्छता मोहिमेला व्यापक रूप देण्याबरोबरच स्वच्छता अभियानात महाबळेश्वरला अव्वल करण्यासाठी पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत संबंधित तक्रारदाराला प्रथम अ‍ॅपद्वारे स्वच्छतेविषयक तक्रार करावी लागणार आहे. पालिकेकडून या तक्रारीचे तातडीने निरसन केले जाईल.

यानंतर संबंधित तक्रारदाराने पालिकेच्या कार्यतत्परतेबाबत स्वच्छता अ‍ॅपद्वारे आपला अभिप्राय नोंदविल्यास त्याला पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे.... अन्यथा दंडात्मक कारवाईमहाबळेश्वर शहरातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. मात्र, अनेक नागरिक अथवा गृहिणी घरातील कचरा घंटागाडीत टाकत नसल्याने पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बाब स्वच्छतेच्या दृष्टीने हितकारक नाही. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. जे असे करणार नाहीत त्याच्यावर पालिका दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे

 

टॅग्स :tourismपर्यटनSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान