शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

महिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:52 IST

सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या ...

ठळक मुद्देमहिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी१६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार

सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे. त्याचबरोबर महिन्यात सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी उभारणार आहे, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, चिन्मय कुलकर्णी, तानाजी काटकर, विक्रम काटकर, एम. जे. काटकर, चांगदेव काटकर, माणिक काटकर, ब्रम्हदेव पुकळे, दीपक खताळ, राम देशमुख, संजीव साळुंखे, अनिल भोसले, आप्पासाहेब लिगाडे, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.गारळे म्हणाले, खटाव तालुक्याच्या कलेढोण भागातील १६ गावांसाठी कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जिल्ह्याच्या सीमेवरुन टेंभू येजेनेचे पाणी जात आहे. त्यामुळे या गावांना हे पाणी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यातच शासनही काही करत नसल्याने या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. या भागात आटपाडी पॅटर्नप्रमाणे पाणी मिळण्याची गरज असून ते सोयीचे ठरणारे आहे.कुलकर्णी म्हणाले,  पाण्यासाठी या भागातील लोकांनी लढा सुरू केलाय. याला कारण म्हणजे धरणे सातारा जिल्ह्यात आणि पाणी जाते पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यात. हे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पण, अगोदर सातारा जिल्ह्यातील शेतीला आणि लोकांना पाणी मिळायला हवे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी साताऱ्यात या गावांच्या पाण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच याबाबत एक महिन्याच्या आत सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात जनवारांची छावणी उभारणार आहे.अस्तित्वाच्या लढाईसाठी धरण फोडण्याचाही इशारा...या पत्रकार परिषदेत माण आणि खटाव तालुक्यातील या संतप्त ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अस्तित्वाच्या लढाईसाठी आता आम्ही निर्णय घेऊन पाणी येत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार घालणार आहे. रस्त्यावर उतरु, जेलभरो आंदोलन करु. प्रसंगी धरणेही फोडू पण, आमच्या हक्काचे पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. तरच आमची होरपळ थांबणार आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर