शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

लोक सर्तक राहिल्यास गुन्हे आटोक्यात -पोलीस अन् जनतेचं आपुलकीचं नातं हवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 01:31 IST

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे.

ठळक मुद्दे--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

दत्ता यादव ।शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस जवानांचे नेटवर्क स्ट्राँग करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच यादीवरील गुन्हेगार आणि गुन्ह्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाºया गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली जात आहे. पोलीस आणि जनतेचं आपुलकीचं नातं निर्माण होण्यास प्रयत्न केले जात आहेत. हे नवे धोरण शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी अवलंबले असून, या संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित..

प्रश्न : गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी काय करायला हवं?उत्तर : जनता सतर्क राहिली तर निम्म्याहून अधिक गुन्हे घडण्यापासून टळतात. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे आमचे मुख्य काम आहे. पोलिसांचं जनतेशी आपुलकीचं नातं असायला हवं. साताºयाची जनताही सुज्ञ आहे. आपल्या आजूबाजूला कसल्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवायला हवं. गुन्हेगारीमध्ये सक्रिय असणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर असते. असे गुन्हेगार पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नसतात.

प्रश्न : आपल्या टीमचं वेगळेपण काय?उत्तर : आमच्या सर्वच पोलीस जवानांच्या टीमचे शहरात नेटवर्क अत्यंत चांगलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टीम सक्षम आहे. गुन्हा घडू नये, यासाठी टीम प्रयत्नशील असते. मात्र, तरीही गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच आमची टीम गुन्हा उघडकीस आणते.

प्रश्न : गुन्ह्यांमध्ये अलीकडे लहान मुलांचाही सहभाग दिसून येतोय?उत्तर : लहान मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष झाल्यानंतर हे प्रकार घडत आहेत. वडील आणि मुलाचं नातं मैत्रीचं असायला हवं. या मुलांना कायदा सुधारण्याची संधी देते; परंतु पुढचे काम पालकांचे आहे. मुलांचे करिअर घडण्याची हीच वेळ असते. त्यामुळे पालकांनी मुलांमध्ये मैत्रीचे नाते तयार करुन संस्कार करावेत.

 

पुण्यातील अनुभव कसा होता..पुण्यामधील तळेगाव दाभाडे येथे काम करत असताना तेथील टीमचेही चांगले सहकार्य लाभले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले. नागरिकांना सतर्क करण्याचे काम आम्ही साताºयातही करत आहे. वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरते.सीसीटीव्ही पाहिजे्र्रपोलिसांचा सोबती म्हणून सध्या सीसीटीव्हीला अत्यंत महत्त्व आले आहे. शंभर पोलिसांचे काम एक सीसीटीव्ही करू शकतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने महिलेला चाकूचा धाक दाखवून त्यांची दुचाकी चोरून नेली होती. त्यावेळी हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यामुळे संबंधित संशयितापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत झाली. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सीसीटीव्ही हवेच, असे पाटील यांचे मत आहे. 

साताºयात पहिल्यांदाच मी काम करतोय. वरिष्ठांपासून आमच्या टीमपर्यंत सर्वांचेच सहकार्य मिळतेय. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत होत आहे.- मुगुट पाटील, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर