शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:58 IST

रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल.

सातारा : पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तेथील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करावे लागू शकते, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

नायगाव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने अजित पवार आले होते. नायगाववरून ते थेट साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आले. साताऱ्यात राष्ट्रवादी भवनामध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ‘रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. लोक इतर वेळी जरी मास्कचा वापर करीत असले तरी एकमेकांशी बोलताना किंवा नाश्ता, चहाला एकत्रित आले असताना ते मास्कचा वापर करीत नाहीत. त्यातूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

अजित पवार म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कमी पडली. निवडणुकांमध्ये यश-अपयश चालतच असते. आता पुढे काय करावं ते राणेंनी ठरवावं. आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १४ जागा बिनविरोध केल्या. सातारा, सांगली या जिल्हा बँकांमध्येदेखील आम्हाला यश आलेले आहे. आता इथून पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कसे टिकेल, तसेच जनतेला योग्य दिशेने नेण्यासाठी निर्णय घेण्याचे काम आमचे सरकार करील.

ओबीसी समाजास राजकीय आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे इम्पिरिकल डेटा गाेळा हाेऊ द्या, ताेपर्यंत निवडणुका नकाेत अशी भूमिका आहे. ओबीसी इम्पिरिकल डेटा गाेळा करण्यासाठी समितीने दाेन महिन्यांची मुदत मागितली आहे; परंतु तीन महिने लागले तरी चालतील. जाेपर्यंत ओबीसी समाजास आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही. ताेपर्यंत स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नेमावे लागले तरी चालतील.’

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होता असे भाजपचे नेते सांगतात, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्रित जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा होता. मात्र, पुढच्या काळामध्ये जे बदल होत गेले, त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबतच तिसऱ्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले आहे. हे चित्र बदलले यामुळेच हा मुद्दा आम्हाला पुढे नेता आलेला नाही.

राणे अनेकदा फसलेत...

महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत, एक वर्षात, दीड वर्षात पडेल, असे विरोधक वेळोवेळी घोषणाबाजी करीत होते. मात्र, तरीही हे सरकार दोन वर्षे खंबीरपणे टिकले आहे. आता सरकार पाडण्यासाठी राणेंवर जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वीही १९९९ ते २००४ या काळातील आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांनी सहा आमदारांना फोडले होते. प्रलोभने दाखवली तरीसुद्धा सरकार टिकले. राणे यांनी फार पूर्वीपासून असे प्रयत्न केले. मात्र ते फसले अशी खरमरीत टीकादेखील अजित पवार यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या