शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:50 IST

रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते.

देशी गायीला राजमातेचा दर्जा द्या, जर कोणी विकायला निघाला, तर त्याला फाशी द्या. मात्र, जर्सी गाय, जर्सी होस्टन, म्हैस, बैल, जर्सी गायीचे खोंड, यांना अडवू नका, हे त्याच्या जगण्याचं साधन आहे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते.

खोत म्हणाले, "आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा शेतकरी चालायला तयार आहे, हे सांगण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने येथे आलो आहोत. मुळात शेती हा एक व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसाय हा त्याचा प्रमुख भाग झाला आहे. शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला दूध सोडून इतर कुठलेही येत नाहीत. परंतु काही लोक या व्यवसायात अडथळे निर्माण करीत आहेत.  ग्रामीण भागात देशी गाय शेतकरी कधीही विकत नाही; देशी कायीला शेतकरी गोमाता मानतो. तो ती पाहुण्यांना, मित्रांना मोफत देतो.  पण दुधाळ संकरीत गाय, जर्सी, होस्टन,  म्हैसाना म्हशी या मात्र तो विकतो." खोत एबीपी माझासोबत बोलत होते. 

खोत पुढे म्हणाले, एका गायीपासून तीन गाई झाल्या, दोन गायींपासून पाच गायी झाल्या, तर त्यांपैकी काही, तो मुलांच्या शिक्षणासाठी, लेकीच्या लग्नासाठी, आजारपणावेली तो देत असतो. पण गोवंश हत्या कायद्याच्या आजोशाने अनेक जण गायींचे रक्षण करण्यासाठी पुढे यायला लागले आहेत आणि विकायला जाणाऱ्या जरसी यागींना अडवायला लागलेत. जप्त  करून परत गोशाळेत न्यायला लागले आहेत. शेतकरी न्यायालयात फिरतो, गोशाळांना दोन-दोन लाख रुपये द्यावे लागतात आणि तरीही जनावरे मिळत नाहीत.  यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसाय मोडकळीस येईल आणि दुग्ध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतील आणि त्यांच्या आत्महत्या सुरू होतील. म्हणून सरकारने या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल आणि दही, दुधाचा कोटा वाचवावा लागेल. हे सांगण्यासाठी येथे आलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे." 

याशिवाय, "भाकड गायींना आधी ५०००० मिळत होती. आता १०००० मिळेनात, नुसती एक गाय सांभाळायची म्हटलं तर महिन्याला ९००० रुपये खर्च येतो, वर्षाला १,१०,००० रुपये. शेतकरी हे पैसे कुठून आणणार? तुम्ही का त्याच्या अर्थचक्रात अडथळा निर्माण करत आहात? असा माझा प्रश्न आहे. असेही खोत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcowगाय