शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:50 IST

रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते.

देशी गायीला राजमातेचा दर्जा द्या, जर कोणी विकायला निघाला, तर त्याला फाशी द्या. मात्र, जर्सी गाय, जर्सी होस्टन, म्हैस, बैल, जर्सी गायीचे खोंड, यांना अडवू नका, हे त्याच्या जगण्याचं साधन आहे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते.

खोत म्हणाले, "आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा शेतकरी चालायला तयार आहे, हे सांगण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने येथे आलो आहोत. मुळात शेती हा एक व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसाय हा त्याचा प्रमुख भाग झाला आहे. शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला दूध सोडून इतर कुठलेही येत नाहीत. परंतु काही लोक या व्यवसायात अडथळे निर्माण करीत आहेत.  ग्रामीण भागात देशी गाय शेतकरी कधीही विकत नाही; देशी कायीला शेतकरी गोमाता मानतो. तो ती पाहुण्यांना, मित्रांना मोफत देतो.  पण दुधाळ संकरीत गाय, जर्सी, होस्टन,  म्हैसाना म्हशी या मात्र तो विकतो." खोत एबीपी माझासोबत बोलत होते. 

खोत पुढे म्हणाले, एका गायीपासून तीन गाई झाल्या, दोन गायींपासून पाच गायी झाल्या, तर त्यांपैकी काही, तो मुलांच्या शिक्षणासाठी, लेकीच्या लग्नासाठी, आजारपणावेली तो देत असतो. पण गोवंश हत्या कायद्याच्या आजोशाने अनेक जण गायींचे रक्षण करण्यासाठी पुढे यायला लागले आहेत आणि विकायला जाणाऱ्या जरसी यागींना अडवायला लागलेत. जप्त  करून परत गोशाळेत न्यायला लागले आहेत. शेतकरी न्यायालयात फिरतो, गोशाळांना दोन-दोन लाख रुपये द्यावे लागतात आणि तरीही जनावरे मिळत नाहीत.  यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसाय मोडकळीस येईल आणि दुग्ध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतील आणि त्यांच्या आत्महत्या सुरू होतील. म्हणून सरकारने या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल आणि दही, दुधाचा कोटा वाचवावा लागेल. हे सांगण्यासाठी येथे आलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे." 

याशिवाय, "भाकड गायींना आधी ५०००० मिळत होती. आता १०००० मिळेनात, नुसती एक गाय सांभाळायची म्हटलं तर महिन्याला ९००० रुपये खर्च येतो, वर्षाला १,१०,००० रुपये. शेतकरी हे पैसे कुठून आणणार? तुम्ही का त्याच्या अर्थचक्रात अडथळा निर्माण करत आहात? असा माझा प्रश्न आहे. असेही खोत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcowगाय