शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कामकाज आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST

सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना अडचणींना सामोरे जाऊनही ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार बिल वेळेत अदा करीत आहे, ही बाब खरोखरच ...

सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना अडचणींना सामोरे जाऊनही ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार बिल वेळेत अदा करीत आहे, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यारूपाने खंबीर नेतृत्व लाभल्यामुळेच हा कारखाना अनंत अडचणींवर मात करून आर्थिकदृष्टया सक्षम होत चाललेला आहे, ही बाब आदर्शवत अशीच आहे, असे गौरवोद्गार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

कारखान्याला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आदी उपस्थित होते.

आयुक्त गायकवाड म्हणाले, राज्यात एक आदर्श कारखाना म्हणून नावारूपास आलेल्या अजिंक्यतारा कारखान्याचा या गळीत हंगामातील साखर उतारा जिल्ह्यात उच्चतम आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यारूपाने योग्य नेतृत्व लाभल्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर आहे. हा कारखाना एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांचे ऊस बिल वेळेत अदा करीत असून, दर दहा दिवसांचे ऊस बिल अदा करणारा महाराष्ट्रातील अजिंक्यतारा हा एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे कामकाज आणखी प्रगतिपथावर कसे नेता येईल याबाबत गायकवाड यांनी मार्गदर्शन करून, तशा सूचना खातेप्रमुख, अधिकाऱ्यांना दिल्या.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊनच कारखान्याचे कामकाज चालविले जाते. त्यामुळे कारखाना प्रगतिपथावर नेण्यास ऊस उत्पादक सभासद, बिगरसभासद यांचेही बहुमोल सहकार्य लाभत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. तसेच संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण असल्यामुळेच कारखाना प्रगतिपथावर नेण्यास वाव मिळत आहे, असेही ते म्हणाले.

फोटो : २५ अजिंक्यतारा

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अजिंक्यतारा कारखान्याला गुरुवारी सदिच्छा भेट दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.