शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

सातारा : मुलीने प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 13:25 IST

मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना क-हाड येथे घडली आहे.

सातारा : मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना क-हाड येथे घडली आहे. नैराश्यातून या दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. बबन नारायण पवार (वय 60 वर्ष) आणि कमल बबन पवार (वय 52 वर्ष)असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.  पवार दाम्पत्य हे क-हाड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रहिवासी होते.  

बारावीत शिकणारी त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून घरातून अचानक निघून गेली होती. त्यांचा दुसरा मुलगा दहावीला तर तिसरी मुलगी आठवीला आहे. मोठ्या मुलीने प्रेम विवाह केल्याची बातमी मिळाल्यानंतर चार दिवसांपासून हे दाम्पत्य अत्यंत अस्वस्थ होते. रात्री मुले घरात झोपली असताना हे दाम्पत्य गुपचूपपणे घरातून बाहेर पडले. घरापासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  पहाटे या परिसरात फिरायला येणा-या लोकांना हे भीषण दृश्य नजरेस पडले. यानंतर घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली.  छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहांचे जागीच विच्छेदन करण्यात आले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या