शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

कोयनेतील पाणीसाठ्याची शंभरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण व परिसरात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे तीन दिवसात ...

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण व परिसरात मागील आठवड्यापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे तीन दिवसात धरणात साडेचार टीएमसीने पाणीसाठा वाढला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ९९.६३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यासाठी अजूनही सवापाच टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे, तर यंदा धरण भरण्यास उशीर लागणार आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस पडला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले होते. रस्ते वाहून गेले होते, तसेच जमिनी तुटल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता. अवघ्या तीन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस पडला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासात १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत. तसेच पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीती व्यक्त होत होती. पण, गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही चांगला पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे, तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यांतही पावसाची हजेरी आहे. यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यांत पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

महाबळेश्वरला ४५ मिलिमीटर पाऊस...

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच नवजा येथे २७ आणि आतापर्यंत ५१४५ व महाबळेश्वरला ४५, तर यावर्षी आतापर्यंत ५१४६ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २९६२८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक स्थिर आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.

............................................................