शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

गाव पाणीदार होण्यासाठी राबतात हजारो हात !

By admin | Updated: April 20, 2017 12:37 IST

खटावमध्ये आशादायी चित्र : वॉटरकपसाठी राजापूर, डिस्कळ, रणशिंगवाडी अन पांगरखेल गावांत मोठी चुरस

आॅनलाईन लोकमतबुध (जि. सातारा), दि. २0 : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारी गावे पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने एकत्र आल्याचे समाधानकारक चित्र खटाव तालुक्याच्या उत्तर भागात पाहायला मिळत आहे़ रणशिंगवाडी, राजापूर, डिस्कळ, पांगरखेल या गावांना वेध लागले आहेत ते आपले गाव पाणीदार बनवण्याचे़ त्यासाठी गावातील सर्वजण हातात फावडे आणि टिकाव घेऊन कामाला लागले आहेत.़ आपल्या गावाला बक्षिस मिळवुन गावातील शिवारात पाणी खेळावे यासाठी हजारो हात राबत असल्याचे आशादायक चित्र पाणी चळवळीला पाठबळ देत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्ष, गटात-तटात विभागलेली जनता वॉटर कप स्पर्धेच्या माध्यामातून जलसंधारणच्या कामासाठी एकाच झेंड्याखाली आली आहे़ भल्या पहाटे हातात टिकाव आणि फावडे, घमेली घेऊन श्रमदानासाठी मोठी गर्दी होत आहे.़ तरूणांबरोबर, ज्येष्ठ नागरिक, महिला श्रमदानात आघाडीवर असतनाही अशावेळी श्रमदान करण्याऱ्यांना पाणी देण्यासाठी बालगोपाळही सरसावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे़ दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्याने तरूणांचाही लक्षणिय सहभाग वाढत आहे. गावातील मुंबई, पुण्यातील चाकरमन्यांकडून या कामासाठी लागणारे टिकाव, फावडे, घमेली पुरवण्यात आल्याने कामाला चांगलीच गती मिळाली आहे.़ रणशिंगवाडी, पांगरेखेल, डिस्कळ, राजापूर या गावात एकीचे बळ पाहायला मिळत आहे. जवळजवळ लागून असलेल्या या गावामध्ये बक्षिस मिळवण्यासाठी मोठी चुरस लागली असून कोण बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. गावातील प्रमुख युवा कार्यकर्ते दररोज श्रमदान करणाऱ्यांची यादी तयार करत असून त्या पध्दतीने नियोजन होत आहे़. पुण्या-मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचेही चांगले योगदान लाभत असल्याचे अशादायक चित्र पाहायला मिळत आहे. (वार्ताहर) जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढला...डिस्कळ, पांगरखेलमधील अनेक जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचबरोबर सीसीटीचेही काम मोठ्या प्रमाणत करण्यात आले आहे़ पांगरखेलमधील श्रमदानामध्ये बुध व परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. पंचायत समितीचे उपसभापती कैलास घाडगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तर डिस्कळमधील पन्नास ते साठ तरूण दररोज श्रमदान करत आहेत. त्यांच्या कामाला सहकार्य करण्यासाठी ग्रामंपयातीने पुढाकर घेतल्यास मोठी चळवळ उभी राहणार आहे. ओढ्याच्या खोलीकरणाचे काम...या स्पर्धत पहिल्या दिवसापासून अगे्रसर असलेली रणशिंगवाडी आणि राजापूर याठिकाणच्या ओढ्यांचे खोलीकरण करणे, मातीबांध घालणे आदी कामे अगदी जलत गतीने केल्याचे पाहायला मिळत आहे़ या कामांमुळे राजापूर आणि रणशिंगवाडी गावामध्ये तरूणांचा एकोपा पहायला मिळत असल्याचे चित्र दिसत आहे़