शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

पावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:46 IST

पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपावसाच्या फेऱ्यात शेकडो एकर स्ट्रॉबेरी, नुकसान वाढले करप्याचा रोगाचा प्रदुर्भाव; लष्करी अळीचीही कीड

पाचगणी : पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचे आर्थिक जीवनमान उंचविणारे स्ट्रॉबेरी पीक यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीच्या गर्तेत अडकले आहे. या पावसाच्या पाण्याच्या थेंबामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांच्या पानांवर व येणाऱ्या फुलांच्या बहरारास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्न वाढीस जोराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी धास्तावलाय. स्ट्रॉबेरीच्या खर्चाची गुंतवणूक व उत्पन्नाचा मेळच बसणे यावर्षी अवघड झालेलं दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे.जून महिन्यात सुरु झालेल्या पावसाने आतापर्यंत उसंतच न घेतल्याने स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड सुद्धा वेळेत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मुळातच स्ट्रॉबेरी हंगामावर त्याचा परिणाम झालाय. परिणामी स्ट्रॉबेरी उशिरानेच मार्केटमध्ये उपलब्ध होणार होती. परंतु आता झाडांना फळ लागण्याची सुरुवात आणि पुन्हा परतीच्या पावसाचा कहर सुरु झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील स्ट्रोबेरीच्या शेतीचे नुकसान होणार आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ जुळवूने कठीण होणार तर आहेच. त्याच बरोबर उत्पादन घटणार असल्याने स्ट्रॉबेरीची चव घेणं अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच स्ट्रॉबेरीच दर गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या वर्षी पावसाने सर्वच शेतीचे नुकसान केले असून या अगोदरच महाबळेश्वर तालुक्यतील वाटाणा, बटाटा, फरसबी हातातून गेलं आहे. आता स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे डोळा लावून शेतकरी बसला होता. परंतु पावसाने व धुक्याने ते पीक सुद्धा हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे.

शासनाने याकडे गांभिर्याने पाहून ओला दुष्काळ जाहीर करीत या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईसाठी एकवटण्याच्या तयारीत आहे.चव पडणार महाग...ऐकूण उत्पन्नाच्या ८० टक्के स्ट्रॉबेरी म्हाबळेश्वर तालुक्यात घेतली जाते. यावर्षी या पावसाच्या अस्मानी संकटामुळे त्यामध्ये मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वरमधील या लालबुंद रुचकर फळाची चव घेणं महाग होणार आहे.

सततच्या पावसाने आम्हा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरटेच मोडलं असून उत्पादन खर्चाचा मेळ बसविणेसुद्धा अवघड झालं आहे. शेतीचा सर्वच खर्च निघणे दुरापस्त झालं आहे. आता आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे.- महेंद्र पांगारे, पांगरीस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी 

 

 

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थानSatara areaसातारा परिसर