शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांबद्दल उमातार्इंना सांगायचे कसे?

By admin | Updated: February 23, 2015 00:46 IST

पानसरे कुटुंबीयांसमोर प्रश्न : नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रीघ

कोल्हापूर : पानसरे अण्णांना आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या उमातार्इंना अण्णा आपल्यातून निघून गेल्याचे सांगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. भ्याड हल्ल्यात उमातार्इंच्या मेंदूला झालेली इजा आणि त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त तूर्त, तरी न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांची रुग्णालयात रविवारी रीघ लागली होती.गेल्या बारा वर्षांपूर्वी अवी पानसरे यांचे अचानक निधन झाले. त्या धक्क्यातून उमाताई लवकर सावरल्या नव्हत्या. त्यानंतर अण्णा त्यांना बाहेरील कार्यक्रम, अन्य ठिकाणी जाताना कायम समवेत घ्यायचे. आंदोलने, वकिली आदी स्वरूपातील दैनंदिन कामे उरकल्यानंतर ते अधिकतर वेळ उमातार्इंसाठी देत होते. त्या दोघांचा एकमेकांना मोठा आधार होता. शिवाय त्यांच्यातील भावनिक बंध अतूट होते.भ्याड हल्ल्यानंतर या दोघांवर तातडीने उपचार झाले. त्यातून उमातार्इंच्या प्रकृती दिवसागणिक सुधारत आहे. त्या बोलत आहेत. अशा स्थितीत त्यांना अण्णांच्या निधनाचे वृत्त सांगितल्यास त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि उमातार्इंची प्रकृती सुधारावी याची दक्षता म्हणून कुटुंबीयांनी अण्णांच्या निधनाचे वृत्त त्यांना न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रकृती सुधारल्यानंतर देखील त्यांना हे वृत्त कसे सांगायचे, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासह उमातार्इंच्या प्रकृतीची चौकशीसाठी रविवारी दिवसभर नातेवाईक, कार्यकर्ते रुग्णालयात, त्यांच्या निवासस्थानी येत होते. त्यात पानसरे यांच्या जन्मगाव कोल्हार, रहाटा, अहमदनगर, नेवासे, नाशिक आदी ठिकाणांचे नातेवाईक, कार्यकर्त्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)मेघा पानसरेंवर जबाबदारी...अण्णांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. त्याबद्दल्यात दररोज खाव्या लागणाऱ्या गोळ्या अण्णांना आवडत नव्हत्या. गोळ्या खाऊन जगायचे त्यांना रूचत नव्हते. पण, अवी यांच्या निधनामुळे सून मेघा आणि नातू कबीर व मल्हार यांना सांभाळणे, त्यांना बळ देण्याची जबाबदारी असल्याने गोळ्या खाऊन ते तब्येत सांभाळून होते. मुलगा गेल्यानंतरही ते खचून न जाता ठामपणे उभे राहिले. आता अण्णांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी मेघा पानसरे यांच्यावर पडली आहे. अधिवेशनाचे काय?उमातार्इंची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. त्या बोलत आहेत. दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या कन्या मेघा व स्मिता तसेच स्नुषा मेघा यांनाच भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी सोडण्यात येते. बाबांची तब्येत सुधारत असल्याचे त्यांना सांगण्यात येते. उमातार्इंनी शनिवारी तोंडावाटे ज्यूस घेतला शिवाय त्यांनी पक्षाचे अधिवेशन आहे ना? हे दवाखान्यात आहेत मग, अधिवेशनाचे काय झाले? असे मेघा व स्मिता यांच्याकडे विचारणा केली.कार्यालयात नीरव शांतता...कामगार, मोलकरणी, अंगणवाडी सेविका अशा कष्टकरी, सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठीचा लढा, आंदोलनांचा निर्णय घेणे, चर्चासत्र, अधिवेशनाचे नियोजन आदींची धांदल सुरू असलेल्या बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रविवारी नीरव शांतता होती. ‘लढेंगे, जितेंगे! कॉ. गोविंद पानसरे को लाल सलाम. पानसरे मरे नहीं! पानसरे मरते नहीं! अण्णा हा लढा थांबणार नाही!’ हा नोटीस फलकावरील मजकूर नजरेत साठवून ‘कॉम्रेड रडायचं नाही, लढायचं’ असा निर्धार आणि हुंदका आवरून कार्यकर्ते हे कार्यालयातील अण्णांच्या खुर्चीचे दर्शन घेऊन बाहेर पडत होते.