शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बिबट्याचं घर दोन दशकांपासून उसातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:11 IST

नितीन काळेल। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सकाळी बिबट्यानं या गावातील जनावरांवर हल्ला केला, तर सायंकाळी तो तिथल्या घरासमोरून ...

नितीन काळेल।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सकाळी बिबट्यानं या गावातील जनावरांवर हल्ला केला, तर सायंकाळी तो तिथल्या घरासमोरून गेला. रात्री तर लांडगा, तरस, वस्तीवर आला होता. अशा प्रकारे कोठे ना कोठे वन्यप्राण्यांबद्दल चर्चा सुरू असतात. याला कारण म्हणजे जंगलातील खाद्य कमी होणे व लोकांच्या अतिक्रमणामुळेच हे प्राणी खाद्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. दोन-तीन दशकांपासून बिबट्याचं वास्तव्य अधिक करून उसातच असून, त्यांच्या स्थलांतराच्या वाटाही रोखल्या आहेत. त्यामुळेच भरकटून हे शिकारी प्राणी मानवी वस्तीत येत आहेत.जंगलात अनेक प्राणी हे मांसाहारी असतात. जंगलातीलच प्राण्यांची शिकार करून ते खातात. तर काही वन्यप्राणी शाकाहारी म्हणजेच तृणधान्य खाणारे असतात. मांसाहारी प्राणी जंगलातीलच हरण, ससे, चितळसारख्या प्राण्यांवर हल्ला करून पोटाची भूक भागवतात; पण अलीकडील काही वर्षांत जंगलातील शिकार करणारे प्राणी मानवी वस्तीत दिसू लागले आहेत. लोकवस्तीत येऊन कुत्र्याची शिकार करणे, पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे असे प्रकार होत आहेत. विशेषत: करून बिबट्याचा वावर मानवी वस्तीत अधिक आहे.कºहाड, पाटणसारख्या तालुक्यांत बिबट्या वारंवार दिसतो. तसेच त्याच्याकडून गावाशेजारी येऊन घरात घुसणे, कुत्री, पाळीव प्राण्यावर हल्ला करणे असे प्रकार होतात. तर सातारा शहराच्या आसपासच्या उपनगरातही वारंवार बिबट्या दिसून आला आहे. पिंजरा लावूनही तो त्याकडे फिरकला नाही. बिबट्या हा जंगलातील प्राणी असलातरी गेल्या दोन-तीन दशकांत तो उसातच वाढला आहे. त्याच्या दोन-तीन पिढ्या उसातच जन्माला आल्या. त्यातच जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जंगलात राहिला. त्यामुळे त्याला जंगल हे आपला अधिवास आहे, असे वाटत नाही. त्यामुळेच तो उसातून बाहेर येऊन मानवीवस्तीत खाद्यासाठी येत असतो.लांडगा, कोल्हा, तरस हे ही चोरटे शिकारी आहेत. तरससारखा प्राणी टाकून दिलेल्या मांसाच्या शोधात गावात येतो. लांडगा तर दिवसाही शेळ्या, मेंढ्यांची शिकार करतो. मानवी वस्तीत खाद्य अधिक असल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत येत आहेत. खाद्याची कमतरता व लोकांचे जंगलात अतिक्रमण हेच यामागील प्रमुख कारण आहे, हेच समोर येते.सहजासहजीमिळणारे भक्ष्य...बिबट्या हा अनुकूलनशील प्राणी आहे. त्याला विशिष्ट ठिकाणीच राहू वाटते, असे नाही. उसात राहतो तसेच त्याचे डोंगरकपारीतही वास्तव्य असते. त्याचबरोबर त्याला कुत्र्यासारखा प्राणी खाद्य म्हणून आवडतो. असे भक्ष्य मानवी वस्तीत सहजासहजी मिळते. म्हणून तो गाव, शहराजवळ अधिक करून येत असावा, असा अंदाज आहे.पर्यटन, लाकूडतोड, शेतीही कारणीभूत...वनक्षेत्रात विविध कारणांनी लोकांची घुसखोरी वाढली आहे. खणकाम, पर्यटन, बांधकाम, शेती, लाकूडतोड अशी कारणे यामागे आहेत. परिणामी जंगलातील प्राण्यांना हा धोका वाटू लागला. तसेच जंगलक्षेत्र विरळ झाले, गवताळ भाग कमी झाला, यामुळे तृणभक्षी जनावरे कमी झाली. यामुळे शिकार करणाऱ्या प्राण्याला खाद्य कमी झाले. त्यामुळे तो भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येत आहे.बिबट्यांची संख्या जिल्ह्यात अधिकराज्यात जुन्नरनंतर सातारा जिल्ह्यात बिबट्याची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात उसाचे प्रमाण अधिक असल्याने लपण्यास जागा आहे. हे एक संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्याचा संचार दिसून येतो.