शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

होळी संपली; जिल्हा तापला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी दिवशीच कमाल तापमान ३८ अंशावर पोहोचल्याने जिल्हा तापू लागला. तर सध्या उष्ण वारेही वाहत असून सातारा शहरातील कमाल तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सातारकर घामाघूम होऊ लागले आहेत.

जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एक वेळ फक्त तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अंशावर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. आता मार्च महिना संपत आला असून किमान तापमान २० अंशावर जाऊ लागले आहे. तर कमाल तापमानही ३५ अंशावर कायम आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे.

सातारा शहरात तर कमाल तापमान सतत ३५ अंशावार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमान हे ३८ अंशावर राहिले आहे. यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

चौकट : साताऱ्यातील किमान आणि कमाल तापमान असे...

दि. १५ मार्च १८.०२ ३५.०७

दि. १६ मार्च १८.०८ ३६.०१

दि. १७ मार्च १९ ३६.०४

दि. १८ मार्च १९.०५ ३६.०४

दि. १९ मार्च २१.०४ ३५.०५

दि. २० मार्च १९.०१ ३५.०१

दि. २१ मार्च १८.०९ ३४.०५

दि. २२ मार्च १९.०१ ३५.०८

दि. २३ मार्च २१.०५ ३३.०५

दि. २४ मार्च २०.०७ ३६.००

दि. २५ मार्च १९.०३ ३६.०१

दि. २६ मार्च २०.०५ ३८.०१

दि. २७ मार्च २०.०४ ३८.००

दि. २८ मार्च २०.०० ३८.०५

दि. २९ मार्च १९.०७ ३८.०९

दि. ३० मार्च २०.०५ ३७.०३

...............................................................