शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

होळी संपली; जिल्हा तापला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यातच होळी दिवशीच कमाल तापमान ३८ अंशावर पोहोचल्याने जिल्हा तापू लागला. तर सध्या उष्ण वारेही वाहत असून सातारा शहरातील कमाल तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सातारकर घामाघूम होऊ लागले आहेत.

जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एक वेळ फक्त तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अंशावर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. आता मार्च महिना संपत आला असून किमान तापमान २० अंशावर जाऊ लागले आहे. तर कमाल तापमानही ३५ अंशावर कायम आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे.

सातारा शहरात तर कमाल तापमान सतत ३५ अंशावार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहेत. गेल्या चार दिवसांत तर कमाल तापमान हे ३८ अंशावर राहिले आहे. यामुळे उन्हाची तीव्रता आणखी वाढत जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

चौकट : साताऱ्यातील किमान आणि कमाल तापमान असे...

दि. १५ मार्च १८.०२ ३५.०७

दि. १६ मार्च १८.०८ ३६.०१

दि. १७ मार्च १९ ३६.०४

दि. १८ मार्च १९.०५ ३६.०४

दि. १९ मार्च २१.०४ ३५.०५

दि. २० मार्च १९.०१ ३५.०१

दि. २१ मार्च १८.०९ ३४.०५

दि. २२ मार्च १९.०१ ३५.०८

दि. २३ मार्च २१.०५ ३३.०५

दि. २४ मार्च २०.०७ ३६.००

दि. २५ मार्च १९.०३ ३६.०१

दि. २६ मार्च २०.०५ ३८.०१

दि. २७ मार्च २०.०४ ३८.००

दि. २८ मार्च २०.०० ३८.०५

दि. २९ मार्च १९.०७ ३८.०९

दि. ३० मार्च २०.०५ ३७.०३

...............................................................