शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मालट्रकची धडक; पादचारी महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीतील चौपाळा येथे खासगी कंपनीत जाण्यासाठी रस्ता दुभाजकांमधून महामार्ग ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला ...

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीतील चौपाळा येथे खासगी कंपनीत जाण्यासाठी रस्ता दुभाजकांमधून महामार्ग ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला मालट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये पादचारी महिला जागीच ठार झाली. सुरेखा बाळकृष्ण घोडके (वय ४९, रा. हरिश्चंद्री, कापूरव्होळ, ता. भोर, जि. पुणे) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हरिश्चंद्री येथील सुरेखा घोडके या शिरवळ येथील एका कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी सकाळी आठच्यादरम्यान कंपनीमध्ये जाण्याकरिता शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी एका वाहनामधून सुरेखा घोडके उतरल्यानंतर रस्ता दुभाजकामधून महामार्ग ओलांडत होत्या. याचवेळी पुणेच्या बाजूकडून भरधाव आलेल्या मालट्रक (एमएच १२ क्यूडब्ल्यू ३१९४) ने जोरदार धडक दिली. त्यानंतर सुरेखा घोडके या महामार्गावर पडत मालट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने मालट्रकचे चाक डोक्यावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी होत जागीच ठार झाल्या. यावेळी सुरेखा घोडके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शिरवळ पोलिसांनी मालट्रक चालक सुभाष विक्रम सोनावणे (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. यावेळी अपघातानंतर बघ्यांनी गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी बघ्यांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण व गर्दी केल्याने पोलिसांना मदतकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

चौकट

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हद्दीमध्ये चौपाळा येथील अपघाताला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्राचा गलथान कारभार कारणीभूत असून, साधारणपणे २००३ पासून याठिकाणी अपूर्णावस्थेमध्ये असणाऱ्या पुलामुळे व याठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना महामार्गावरून रस्ता ओलांडावा लागत आहे. याठिकाणी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही महामार्गाचे काम संबंधितांनी अद्यापही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे अपघाताला दोषी धरून संबंधितांवर शिरवळ पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिरवळ व धागारवाडी ग्रामस्थांनी केली आहे.