शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

हिंगणी शाळेत ३६५ दिवस शिक्षण !

By admin | Updated: June 30, 2016 00:05 IST

शारीरिक-बौद्धिक खेळ : सत्तर उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर-- अशी ही जगावेगळी शाळा

सचिन मंगरूळे -म्हसवड  -सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या हिंगणी, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेत ३६५ दिवस शिक्षण दिले जाते. हा उपक्रम राबविणारी ही राज्यातील दुसरी तर जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी विविध ७० उपक्रम शाळेत राबविले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो शाळेचा. विशेषत: प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या व ग्रामीण भागातील हक्काच्या जिल्हा परिषद शाळांना अत्यंत महत्त्व आहे. काही वर्षांत खासगी शाळांच्या अतिक्रमणात जिल्हा परिषद शाळांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मात्र लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांनी शाळांचे रूपडे पालटवले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमातून सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या महाराष्ट्रात ‘३६५ दिवस शाळा’ हा उपक्रम चालवणारी पुणे जिल्ह्यातील कडिर्लेवाडी पहिली तर माण तालुक्यातील हिंगणीची दुसरी शाळा आहे. विद्यार्थ्यांना लाठी-काठी, कराटे, अ‍ॅप्सच्या साह्याने इंग्रजी स्पिकिंग कोर्स, मनोरंजक खेळ, संगणक प्रशिक्षण, बचत बँक, वर्ग सजावट, वाद्यांग, डिजिटल क्लासरूम, सर्व अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी सामान्यज्ञान वाढण्यासाठी शाळेत वर्तमानपत्र सुरू केले आहे. शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे होतात. वाढदिवसाला शाळेला पुस्तके भेट दिली जातात. पगारातील तीन टक्के वाटा शाळेसाठीशिक्षक वार्षिक पगाराच्या तीन टक्के खर्च शाळेसाठी करतात. ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन व अध्यापन, पाढे पाठांतर यांसह ७० उपक्रम या शाळेत राबविले जातात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते तर येथील विद्यार्थी संख्या ११२ आहे. या ठिकाणी सर्व सण, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आपली शाळा इतरांपेक्षा वेगळी असावी, यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी, सरपंच नितीन घुटुगडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. शाळेसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून ग्रामस्थ आर्थिक मदत करत असतात. शालेय ज्ञानाबरोबरच त्यांच्यात खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी व स्वसंरक्षण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, यासाठी शाळेत विविध ७० उपक्रम राबवितो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबली आहे.- विजयकुमार काळे, शिक्षक जि. प. शाळा, हिंगणी