शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी शाळेत ३६५ दिवस शिक्षण !

By admin | Updated: June 30, 2016 00:05 IST

शारीरिक-बौद्धिक खेळ : सत्तर उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर-- अशी ही जगावेगळी शाळा

सचिन मंगरूळे -म्हसवड  -सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या हिंगणी, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेत ३६५ दिवस शिक्षण दिले जाते. हा उपक्रम राबविणारी ही राज्यातील दुसरी तर जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी विविध ७० उपक्रम शाळेत राबविले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो शाळेचा. विशेषत: प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये सर्वसामान्यांच्या व ग्रामीण भागातील हक्काच्या जिल्हा परिषद शाळांना अत्यंत महत्त्व आहे. काही वर्षांत खासगी शाळांच्या अतिक्रमणात जिल्हा परिषद शाळांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मात्र लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांनी शाळांचे रूपडे पालटवले. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमातून सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या महाराष्ट्रात ‘३६५ दिवस शाळा’ हा उपक्रम चालवणारी पुणे जिल्ह्यातील कडिर्लेवाडी पहिली तर माण तालुक्यातील हिंगणीची दुसरी शाळा आहे. विद्यार्थ्यांना लाठी-काठी, कराटे, अ‍ॅप्सच्या साह्याने इंग्रजी स्पिकिंग कोर्स, मनोरंजक खेळ, संगणक प्रशिक्षण, बचत बँक, वर्ग सजावट, वाद्यांग, डिजिटल क्लासरूम, सर्व अद्ययावत रेकॉर्ड, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी सामान्यज्ञान वाढण्यासाठी शाळेत वर्तमानपत्र सुरू केले आहे. शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे होतात. वाढदिवसाला शाळेला पुस्तके भेट दिली जातात. पगारातील तीन टक्के वाटा शाळेसाठीशिक्षक वार्षिक पगाराच्या तीन टक्के खर्च शाळेसाठी करतात. ज्ञानरचनावादावर आधारित अध्ययन व अध्यापन, पाढे पाठांतर यांसह ७० उपक्रम या शाळेत राबविले जातात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते तर येथील विद्यार्थी संख्या ११२ आहे. या ठिकाणी सर्व सण, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आपली शाळा इतरांपेक्षा वेगळी असावी, यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मुलाणी, सरपंच नितीन घुटुगडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. शाळेसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून ग्रामस्थ आर्थिक मदत करत असतात. शालेय ज्ञानाबरोबरच त्यांच्यात खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी व स्वसंरक्षण होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी, यासाठी शाळेत विविध ७० उपक्रम राबवितो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबली आहे.- विजयकुमार काळे, शिक्षक जि. प. शाळा, हिंगणी