शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वाधिक दर २,४३१ रुपयांचा

By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST

एफआरपीची घोषणा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या सभासदांचे भवितव्य स्पष्ट; ‘ग्रीन पॉवर’ची एफआरपी नीचांकी

संजय कदम -- वाठार स्टेशन-गेल्या वर्षापासून पहिल्यांदाच राज्यात केंद्राच्या एफआरपीनुसार उसाचा दर, अशी भूमिका शासनाने घेतल्याने मागील गाळप हंगामातील शासनाने जाहीर केलेली एफआरपी अद्याप काही कारखान्यांनी दिली नसताना आता नव्याने चालू हंगामाची एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. मागील गाळप हंगामातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यावरून चालू हंगामातील तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता या हंगामात सर्वाधिक एफआरपी जरंडेश्वरची २,४३१ रुपयेतर सर्वात कमी एफआरपी २,०६८ रुपये ग्रीन पॉवर शुगर्सने जाहीर केली आहे.शासनाने जाहीर केलेली एफआरपी रक्कम एकरकमी देणे जरी कारखान्यांना बंधनकारक असले तरी सध्याच्या परिस्थितीत ती देणे शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेत शासनाने याबाबत कारखानदारांना योग्य ती मदत करण्याची गरज व्यक्त केली आहे. तर शासन प्रवाहात घटक पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र तलवार म्यान करूनच सत्ता सहभागात लालदिव्याच्या मोहापोटी गप्प राहिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारच्याच भरोशावर बसण्याची वेळ आली आहे.एफआरपीबाबत कारखानदारांच्या भूमिका विचारात घेणेही गरजेच्या आहेत. यामध्ये शासन केवळ उसाच्या दराबाबत आग्रही भूमिका घेत आहे. मात्र साखरेच्या दराबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. जो पर्यंत साखरेच्या दराबाबत हमीभाव निश्चित होत नाही, तो पर्यंत तरी एफआरपी देण्याबाबत कारखानदार अडचणीत सापडणार आहेत. बाजारपेठेत साखरेची अस्थिरता, बँकाची मिळणारी उचल यातील तफावत लक्षात घेता शासनाच्या एफआरपी धोरणात बदल होणे गरजेचे आहे.चालू हंगामासाठी जाहीर केलेली एफआरपी रक्कम ऊस गाळपानंतर १४ दिवसांत ऊसतोड केलेल्या शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित कारखान्याची उत्पादित साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्याची रक्कम वसूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. अशी वेळ अद्याप तरी कोणत्याही कारखान्यावर आजपर्यंत आली नाही. मात्र, जाहीर एफआरपी शेतकऱ्यांना एकरकमी कशा पद्धतीने देणे शक्य आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.६ लाख ६१ हजार क्विंटल साखरेची निर्मिती आज अखेर जिल्ह्यातील एकूण १२ कारखान्यांनी आपल्या गाळपाचा शुभारंभ करीत ६ लाख ६८ हजार २३४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ६ लाख ६१ हजार ८१० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. या हंगामात रयत कारखान्याने अद्याप गाळपाचा शुभारंभ केलेला नाही.नव्याने जाहीर केलेली कारखानानिहाय एफआरपी :