शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; झाडे पडली; दरडी कोसळल्या; कोयना पाणीसाठ्यात वाढ 

By नितीन काळेल | Updated: June 16, 2025 19:24 IST

प्रमुख धरण क्षेत्रात पाऊस 

नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून साेमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०४ तर नवजाला ८० मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून सायंकाळी पाचपर्यंतच्या नऊ तासांत साठ्यात सुमारे पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. या पावसामुळे पश्चिम भागात रस्त्यावर झाडे पडत असून दरडीही कोसळू लागल्यात.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनच्या पावसाने काहीशी दडी मारली होती. पण, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा पडू लागला आहे. तर पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला आहे. एकसारखा पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातच जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाणी आवक सुरू झाली आहे. परिणामी धरण पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान कोयनानगर येथे नोंद झाले आहे. १०४ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ८० आणि महाबळेश्वरला ७० मिलीमीटर पाऊस झालेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता आतापर्यंत कोयनेला २५१, नवजा २४१ आणि महाबळेश्वर येथे १९६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.संपूर्ण कांदाटी खोऱ्यातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास १२ हजार ५३८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २४.१६ टीएमसी पाणीसाठा झाला होता.