शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सातारा: रहिमतपुरात पावसाचे तांडव, कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला; वाहतूक ठप्प, पिके गेली वाहून

By प्रशांत कोळी | Updated: October 14, 2022 19:00 IST

पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात पावसाने अक्षरशः तांडव केले. धुवाधार पावसाने कमंडलू नदीवरील पुलाचा भराव ढासळला असून पुलाचे लोखंडी अँगल वाहून गेले आहेत. तर ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे अनेक गावातील लहान पूल सिमेंटच्या पाईपसह वाहून गेले. ओढ्याच्या बाजूच्या शेतातील पिकेही वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले. अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.रहिमतपूर परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. कमंडलू नदीवरील पुलावरून पाणी वाहिले. या पुलाचे लोखंडी दरवाजे न उघडण्याचा जोरदार फटका पुलाला व शेजारील डांबरी रस्त्याला बसला आहे. सुमारे एक टन वजनाचा एक दरवाजा याप्रमाणे दहा दरवाजे या पुलाला बसविण्यात आले आहेत. मात्र पावसाचे तांडव सुरू असतानाही दरवाजे न उचलल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका पुलावरील लोखंडी पाईपला बसून लोखंडी पाइप तुटून वाहून गेल्या. तसेच पाण्याच्या दाबामुळे पुलाचा भराव ढासळला असून, पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, काही लोखंडी पाइप मोडलेल्या स्थितीत पुलावरच आडव्या अस्ताव्यस्त पडल्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली होती. नदीच्या काठाला कडब्याच्या लावलेल्या अनेक गंजी व शेणखताचे उकिरडे वाहून गेले आहेत. जोरदार पावसामुळे क्रीडा संकुलाच्या ओढ्याकडील अनेक व्यापारी गाळ्यांमध्ये पाणी शिरले.साप येथील गावडे मळा येथे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आल्यामुळे ओढ्यावरील सिमेंट पाईप टाकलेला रस्ता सिमेंट पाइपसह वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांशी गैरसोय झाली आहे. सुर्ली येथील करंजाली ओढ्याला आलेल्या मोठ्या पुरामुळे पूल आणि रस्त्यांमधील भराव वाहून गेला आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.जयपुरातील दोन एकरातील पीक गेले वाहून...अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्याकडेच्या शेतातील प्रकाश निकम यांचे वीस गुंठे शेतातील आले पीक, विठ्ठल निकम यांचे दहा गुंठे शेतातील सोयाबीन, बबन पवार यांचे दहा गुंठे शेतातील ऊस व प्रल्हाद निकम यांच्या चाळीस गुंठे शेतातील टोमॅटो पीक असे एकूण दोन एकरातील शेतीपिके वाहून गेली आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. सरपंच, उपसरपंच, कृषी सहायक, मंडलाधिकारी विनोद सावंत व तलाठी अनिल दिंडे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. हातातोंडाला आलेली पिके पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी