शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात 

By नितीन काळेल | Updated: May 17, 2024 18:38 IST

अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती

सातारा : जिल्ह्यात वादळासह वळीवाचा पाऊस होत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. मागील दीड महिन्यात पाऊस आणि वादळामुळे ११४ घरांचे नुकसान झाले आहे तर ४ शाळांनाही फटका बसलाय. कोंबड्यांसह पशुधनही मृत झाले आहे. यामुळे दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे अंदाजित ४७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात आहे.दरवर्षीच उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो. जोरदार वादळी वारेही वाहतात. त्यातच विजाही कोसळतात. जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागला आहे. त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे. यामुळे नुकसानाच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कऱ्हाड तालुक्याला मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानच अधिक झाले आहे. पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक गावांत नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवरही झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले. तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. वीज वाहिन्यावरही झाडे पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्याबरोबरच महावितरणचे नुकसान झाले. सोमवारी तर कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. तर विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे आडसाली उसासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाला आहे. घरांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर फळबागांना मोठा फटका बसत आहे. वीज पडण्यानेही आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५ मेपर्यंत पाऊस आणि वादळाने ४७ लाख १२ हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जनावरांच्या गोठ्यांनाही फटका..जिल्ह्यात मागील दीड महिन्यात पाऊस तसेच वादळाने शेती पिके तसेच शेतजमिनीचे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. पण ९ घरांचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले आहे तर ३ गोठे आणि शेडलाही वादळाचा फटका बसलाय. त्याचबरोबर १०५ घरे, जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, एका वाहनाचे नुकसान झाले. तसेच १० कोंबड्या, ६ जनावरेही मृत झाली आहेत. तर दोन महिन्यांत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस