शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली, पत्रे उडाले; सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात 

By नितीन काळेल | Updated: May 17, 2024 18:38 IST

अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती

सातारा : जिल्ह्यात वादळासह वळीवाचा पाऊस होत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. मागील दीड महिन्यात पाऊस आणि वादळामुळे ११४ घरांचे नुकसान झाले आहे तर ४ शाळांनाही फटका बसलाय. कोंबड्यांसह पशुधनही मृत झाले आहे. यामुळे दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे अंदाजित ४७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात आहे.दरवर्षीच उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो. जोरदार वादळी वारेही वाहतात. त्यातच विजाही कोसळतात. जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागला आहे. त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे. यामुळे नुकसानाच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कऱ्हाड तालुक्याला मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानच अधिक झाले आहे. पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक गावांत नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवरही झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले. तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. वीज वाहिन्यावरही झाडे पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्याबरोबरच महावितरणचे नुकसान झाले. सोमवारी तर कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. तर विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे आडसाली उसासह फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून दररोज कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. याचा फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक झाला आहे. घरांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर फळबागांना मोठा फटका बसत आहे. वीज पडण्यानेही आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून १५ मेपर्यंत पाऊस आणि वादळाने ४७ लाख १२ हजार रुपयांचे अंदाजित नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जनावरांच्या गोठ्यांनाही फटका..जिल्ह्यात मागील दीड महिन्यात पाऊस तसेच वादळाने शेती पिके तसेच शेतजमिनीचे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. पण ९ घरांचे पत्रे उडून अंशत: नुकसान झाले आहे तर ३ गोठे आणि शेडलाही वादळाचा फटका बसलाय. त्याचबरोबर १०५ घरे, जिल्हा परिषदेच्या ४ शाळा, एका वाहनाचे नुकसान झाले. तसेच १० कोंबड्या, ६ जनावरेही मृत झाली आहेत. तर दोन महिन्यांत वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस